Indian Navy Day : भारतीय नौदल दिनाचे पाकिस्तान कनेक्शन ? जाणून घ्या ‘या’ खास दिवसाचा इतिहास

नवी दिल्ली : भारतीय नौदल दिन दरवर्षी ४ डिसेंबर रोजी संपूर्ण भारतात साजरा केला जातो. नौदलाच्या इतिहासातील हा दिवस एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. भारतीय नौदलाचे शौर्य, समर्पण आणि देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यात त्यांची भूमिका यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी ऐतिहासिक महत्त्व आहे कारण भारतीय नौदलाच्या शूरवीरांनी ४ डिसेंबर रोजी पाकिस्तानचा पराभव केला होता. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय नौदलाच्या विजयाच्या स्मरणार्थ नौदल दिन साजरा केला जातो. भारतीय नौदल दिन केवळ भारतीय नौदलाच्या कामगिरीचा गौरव करत नाही तर देशवासियांना त्यांच्या सैन्याबद्दल अभिमान वाटण्याची संधी देखील देतो.


हा ऐतिहासिक दिवस भारतीय नौदलाचे सामर्थ्य, धैर्य आणि देशासाठी समर्पणाचे प्रतीक आहे. आपल्याला हा दिवस आपल्या सुरक्षा दलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि त्यांचे योगदान समजून घेण्याची संधी देतो. भारतीय नौदलाच्या या भूमिकेचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. अशा परिस्थितीत आज भारतीय नौदल दिनानिमित्त जाणून घेऊया भारतीय नौदलाची स्थापना केव्हा आणि कशी झाली? भारतीय नौदल दिन का साजरा केला जातो?



भारतीय नौदल दिनाचा इतिहास


भारतीय नौदलाची स्थापना इ.स. १६१२ मध्ये झाली होती. तेव्हा त्याला "इंडियन मॅरिटाइम सिक्युरिटी एजंसी" असे नाव देण्यात आले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भारतीय नौदलाची पुनर्रचना करण्यात आली आणि त्याला "भारतीय नौदल" असं नाव देण्यात आले.



४ डिसेंबरला नौदल दिन का साजरा केला जातो?


४ डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा करण्याचे कारण १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाशी संबंधित आहे. पाकिस्तानने या युद्धात ३ डिसेंबरला भारतीय विमानतळावर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर देत भारतीय नौदलाने ४ आणि ५ डिसेंबरच्या रात्री ‘ऑपरेशन ट्रायडेंट’ राबवले. या मोहिमेत भारतीय नौदलाने पाकिस्तानी नौदलाचे मोठे नुकसान केले आणि शेकडो पाकिस्तानी नौदलाचे जवान मारले. या महान विजयाच्या स्मरणार्थ ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.



भारतीय नौदलाची स्थापना


तज्ञांच्या मते, भारतीय नौदल १६१२ मध्ये अस्तित्वात आली, जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने रॉयल इंडियन नेव्ही नावाची नौदल तयार केली. ईस्ट इंडिया कंपनीने व्यापारी जहाजांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने नौदल दलाची स्थापना केली. स्वातंत्र्यानंतर, १९५० मध्ये त्याची भारतीय नौदल म्हणून पुनर्रचना करण्यात आली.

Comments
Add Comment

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी ईडीच्या धाडी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजधानी कोलकात्यात

Indian History : सापडले दोन हजार वर्षे जुने तीन किलो वजनाचे प्राचीन ताम्रपत्र

बिलासपूर : छत्तीसगडच्या बिलासपूर येथील मल्हार परिसरातील रहिवासी संजीव पांडेय यांच्या ताब्यातून सुमारे २०००

Delhi Airport : दिल्ली विमानतळावर स्विस एअर विमानाच्या इंजिनाला आग, ६ प्रवासी जखमी

दिल्लीतील आयजीआय विमानतळावर स्विस एअरच्या एलएक्स १४७ या विमानाच्या टेकऑफदरम्यान विमानाच्या इंजिनमध्ये अचानक

Monsoon 2026 : आनंद वार्ता! यंदा मान्सून लवकर येणार; १८ ते २५ मे दरम्यान पावसाचे आगमन होणार

- युरोपीयन मध्यम श्रेणी हवामान अंदाज केंद्राचा अंदाज एप्रिलमध्ये उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांनी बेजार