Indian Navy Day : भारतीय नौदल दिनाचे पाकिस्तान कनेक्शन ? जाणून घ्या ‘या’ खास दिवसाचा इतिहास

नवी दिल्ली : भारतीय नौदल दिन दरवर्षी ४ डिसेंबर रोजी संपूर्ण भारतात साजरा केला जातो. नौदलाच्या इतिहासातील हा दिवस एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. भारतीय नौदलाचे शौर्य, समर्पण आणि देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यात त्यांची भूमिका यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी ऐतिहासिक महत्त्व आहे कारण भारतीय नौदलाच्या शूरवीरांनी ४ डिसेंबर रोजी पाकिस्तानचा पराभव केला होता. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय नौदलाच्या विजयाच्या स्मरणार्थ नौदल दिन साजरा केला जातो. भारतीय नौदल दिन केवळ भारतीय नौदलाच्या कामगिरीचा गौरव करत नाही तर देशवासियांना त्यांच्या सैन्याबद्दल अभिमान वाटण्याची संधी देखील देतो.


हा ऐतिहासिक दिवस भारतीय नौदलाचे सामर्थ्य, धैर्य आणि देशासाठी समर्पणाचे प्रतीक आहे. आपल्याला हा दिवस आपल्या सुरक्षा दलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि त्यांचे योगदान समजून घेण्याची संधी देतो. भारतीय नौदलाच्या या भूमिकेचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. अशा परिस्थितीत आज भारतीय नौदल दिनानिमित्त जाणून घेऊया भारतीय नौदलाची स्थापना केव्हा आणि कशी झाली? भारतीय नौदल दिन का साजरा केला जातो?



भारतीय नौदल दिनाचा इतिहास


भारतीय नौदलाची स्थापना इ.स. १६१२ मध्ये झाली होती. तेव्हा त्याला "इंडियन मॅरिटाइम सिक्युरिटी एजंसी" असे नाव देण्यात आले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भारतीय नौदलाची पुनर्रचना करण्यात आली आणि त्याला "भारतीय नौदल" असं नाव देण्यात आले.



४ डिसेंबरला नौदल दिन का साजरा केला जातो?


४ डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा करण्याचे कारण १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाशी संबंधित आहे. पाकिस्तानने या युद्धात ३ डिसेंबरला भारतीय विमानतळावर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर देत भारतीय नौदलाने ४ आणि ५ डिसेंबरच्या रात्री ‘ऑपरेशन ट्रायडेंट’ राबवले. या मोहिमेत भारतीय नौदलाने पाकिस्तानी नौदलाचे मोठे नुकसान केले आणि शेकडो पाकिस्तानी नौदलाचे जवान मारले. या महान विजयाच्या स्मरणार्थ ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.



भारतीय नौदलाची स्थापना


तज्ञांच्या मते, भारतीय नौदल १६१२ मध्ये अस्तित्वात आली, जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने रॉयल इंडियन नेव्ही नावाची नौदल तयार केली. ईस्ट इंडिया कंपनीने व्यापारी जहाजांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने नौदल दलाची स्थापना केली. स्वातंत्र्यानंतर, १९५० मध्ये त्याची भारतीय नौदल म्हणून पुनर्रचना करण्यात आली.

Comments
Add Comment

Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित

NEW DELHI : आमच्यावर विटा आणि कुंडी फेकून मारल्या , जखमी दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

नवी दिल्ली : संसदेजवळ झालेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी जवळच असलेल्या एका संरचनेचा काही भाग तोडून विटा गोळा

Urea Production : युरिया उत्पादनात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, खासदार अशोक चव्हाणांच्या प्रश्नाला केंद्राचे उत्तर

नवी दिल्ली : शेती आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या युरिया उत्पादनाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे.

Russian Missile Attack : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ४ भारतीय खलाशांचा मृत्यू; भारताचा संताप, रशियन राजदूतांना समन्स

नवी दिल्ली : युक्रेनच्या किनारपट्टीजवळील व्यापारी मालवाहू जहाजावर झालेल्या रशियन हल्ल्यात चार भारतीय खलाशांचा

Kangana Ranaut On CJP : 'आम्ही संसदेत कैदेत असल्यासारखे अडकलो होतो'; दिल्लीतील हिंसक आंदोलनावर खासदार कंगना रनौत यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : सोमवारी सकाळी दिल्लीच्या मध्यभागी हजारो आंदोलकांनी संसदेच्या दिशेने मोर्चा वळवला. हा मोर्चा

IIT Roorkee : 'राजकीय आंदोलनांना सोशल मीडियावर पाठिंबा देऊ नका'; IIT च्यामोठ्या निर्णयाची देशभरात चर्चा

रुडकी : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रुडकीने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेल्या एका अंतर्गत