प्रहार    

Devendra Fadnavis : दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी प्राणपणाने हे सरकार काम करेल!

  95

Devendra Fadnavis : दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी प्राणपणाने हे सरकार काम करेल!

देवेंद्र फडणवीसांचा निर्धार तर एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आनंद


मुंबई : मला आनंद आहे की, अडीच वर्षांपूर्वी इथंच देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती. आज देवेंद्रजी (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री व्हावेत, अशी शिफारस आणि पाठिंब्याचं पत्र शिवसेनेच्या वतीनं आम्ही दिलं आहे. अतिशय खेळीमेळीच्या आनंदात हे सरकार स्थापन होतंय याचा आनंद आहे, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. राज्यपालांकडे महायुतीच्या (Mahayuti) वतीने सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला. त्यानंतर महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.



शिंदे पुढे म्हणाले, खरं म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासात एवढं बहुमत महायुतीला कधी मिळालं नव्हतं. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी राज्यातले सर्व घटक या राज्यातल्या प्रत्येक मतदारानं महायुतीवर मतांचा वर्षाव केला. ऐतिहासिक आणि दैदिप्यमान यश महायुतीला मिळालं. यामध्ये मागच्या अडीच वर्षात केलेल्या कामाचा वाटा आहे. सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही काम केलं, मतदारांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.


भाजपा नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी काल स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. तुम्ही स्वत: या सरकारमध्ये आमच्यासोबत राहायला हवं, असं निवेदन मी एकनाथरावांना केलं होतं. एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये राहावं, अशी शिवसेनेच्या आमदारांची देखील इच्छा आहे. महायुतीच्या आमदारांची देखील हीच इच्छा आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, ते आमच्या सरकारमध्ये असतील. मी एकनाथ शिंदे यांचं आभार मानतो. त्यांनी मला मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी, असं पत्र दिलेलं आहे. अजित पवार आणि इतर पक्षांनीही पत्र दिलेलं आहे. मी सर्वांचं आभार मानतो. रामदास आठवले यांचेही मी आभार मानतो. मागील अडीच वर्षात एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मी असं तिघांनी एकत्रितपणे निर्णय घेतले आहेत. आज देखील आम्हाला हे पद तांत्रिक बाब आहे. इतर आमच्या मित्र पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रातील लोकांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी प्राणपणाने हे सरकार काम करेलं.


पंतप्रधान यांच्या उपस्थितीत भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आता आम्ही एकत्रितपणे निर्णय घेणार आहोत. जी आश्वासन दिली आहेत ती पूर्ण करु, असा निर्धारही फडणवीस यांनी व्यक्त केला.



मी दिल्लीला कोणाला भेटायला गेलो नव्हतो - अजित पवार


अजित पवार म्हणाले, मी दिल्लीला कोणाला भेटायला गेलो नव्हतो, तर माझ्या कामासाठी गेलो होतो. बंगल्याच्या संदर्भात आर्किटेकला भेटायचं होतं. सोबत आमच्या केसेस सुरु आहे, त्या संदर्भात वकिलांना भेटायचं होतं. इथल्यापेक्षा तिथे आराम मिळतो. म्हणून डोक्यातून काढून टाका मी कोणाला भेटायला गेलो होतो.

Comments
Add Comment

'ग्लोबल गणेश फेस्टिवल २०२५'च्या अध्यक्षपदी एकनाथ शिंदे, स्वागताध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

पुणे: गौरवशाली परंपरा असलेल्या पुण्याचा गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक करण्यासाठी ग्लोबल

कांदा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नाशिक जिल्ह्यातील ९६७२ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १८ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान वितरीत

येवला: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला लासलगाव

तुळजाभवानी मंदिरात तणाव: आव्हाड समर्थकांनी सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की केल्याचा आरोप

तुळजापूर: तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामावरून सुरू असलेल्या वादामुळे तुळजापूरमध्ये राजकीय

ठाण्यात यंदा टेंभीनाक्यावर अनुभवयाला मिळणार थरांचा थरार

ठाणे :  धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन

मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद रो-रो सेवा मार्चपर्यंत कार्यान्वित करा- मंत्री नितेश राणे

डिझेल परतावा योजनेपासून एकही पात्र मच्छीमार वंचित राहणार नाही मुंबई : मुंबईकरांचा कोकणात जाण्याचा प्रवास सुखकर

Laxman Hake on Manoj Jarange Patil: गणेशोत्सवात मुंबईला जाऊन दंगल घडवायचा जरांगेंचा प्लॅन! लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

पुणे: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा मोर्चा घेऊन धडकणार