आसाममध्ये गोमांसावर बंदी- हिमंता बिस्वा सरमा

दिसपूर: पूर्वोत्तर भारतातील आसाममध्ये गोमांसावर बंदी घालण्यात आली आहे. आसाम मंत्रिमंडळाने राज्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांसावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. दरम्यान आगामी 7 डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्येही त्यांनी सांगितले.


आसाममध्ये गोमांस बंदीच्या निर्णयानंतर आसामचे मंत्री पियुष हजारिका यांनी पोस्ट केली आणि काँग्रेसला थेट आव्हान दिले. काँग्रेसने गोमांस बंदीचे स्वागत करावे किंवा पाकिस्तानात जाऊन स्थायिक व्हावे, असे हजारिका म्हणाले. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काही दिवसांपू्र्वीच सांगितले होते की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांनी त्यांना पत्र लिहून मागणी केल्यास ते आसाममध्ये गोमांस बंदी करण्यास तयार आहेत.

आसाममधील काँग्रेस खासदार रकीबुल हुसैन यांनी भाजपवर नागाव जिल्ह्यातील समगुरी विधानसभा मतदारसंघात बीफ पार्टी आयोजित केल्याचा आरोप केला होता. मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाटी ही बीफ पार्टी आयोजित केल्याचे त्यांनी म्हटले होते. यावर हिमंता यांनी हुसैन यांच्या वक्तव्याबाबत गोमांसबाबतच्या भूमिकेबाबत प्रदेश काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले होते. मी भूपेन बोरा यांना पत्र लिहून रकीबुल हुसैन यांच्याप्रमाणे गोमांसावर बंदी घालण्याचे समर्थन करत आहे का, असे विचारेन आणि त्यांची तयारी असल्यास गोमांसावर बंदी घालेन, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती सर्वांनीच गोमांस खाणे बंद करावे, मग सर्व प्रश्न सुटतील, असेही मुख्यमंत्री त्यावेळी म्हणाले होते.
Comments
Add Comment

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे

बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू

बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर

दिवाळी-छटसाठी देशभरात धावणार १२ हजार विशेष गाड्या

नवी दिल्ली  : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार यंदा दिवाळी आणि छट यांसारख्या सणांच्या

भारत-ब्रिटनमध्ये 'व्हिजन २०३५' वर निर्णायक चर्चा! PM मोदी 'या' खास पाहुण्याचं करणार स्वागत

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांचा पहिला भारत दौरा; फिनटेक आणि आर्थिक सहकार्यावर लक्ष मुंबई: पंतप्रधान

मोदी सरकारचा मोठा 'मास्टरस्ट्रोक'! महाराष्ट्रासह चार राज्यात रेल्वे ट्रॅकची क्षमता वाढणार; २४,६३४ कोटी मंजूर!

'४१% रेल्वे वाहतूक' असलेल्या कॉरिडॉरला ४ ते ६ लेनमध्ये विस्तार; वाहतूक खर्च होणार कमी नवी दिल्ली : केंद्रीय