PV Sindhu : पी.व्ही. सिंधू चढणार बोहोल्यावर! होणारा नवरा आहे तरी कोण ?

नवी दिल्ली : भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. आपल्या उत्तम खेळाने अनेक स्पर्धांत यश मिळवणारी, भारताचं नाव उज्ज्वल करणारी स्टार खेळाडू, बॅटमिंटनपटू पी.व्ही.सिंधू आता आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहे. राजस्थानमधील उदयपूर येथे २२ डिसेंबर रोजी पीव्ही सिंधूचा विवाह सोहळा पार पडणार आहे. पीव्ही सिंधूच्या वडिलांनी काल, २ डिसेंबरला सिंधूच्या लग्नाची बातमी चाहते आणि मीडियासमोबत शेअर केली. भारतीय स्टार खेळाडू पीव्ही सिंधूचं लग्न कधी होणार, कोणाशी होणार, मुलगा कोण आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची चाहत्यांना भरूपर उत्सुकता आहे. चला तर मग जाणून घेऊया…



कोण आहे व्यंकट दत्ता साई?


सिंधूचे भावी पती व्यंकट दत्ता साई हे वरिष्ठ आयटी व्यावसायिक आणि पोसाइडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक आहेत. व्यंकट दत्ता साई यांचे वडील जी.टी. व्यंकटेश्वर राव हे या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि ते इंडियन रेवेन्यू सर्विसमध्ये (IRS) अधिकारी आहेत. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात पीव्ही सिंधूने या कंपनीचा नवीन लोगो लाँच केला होता. आता लवकरच पीव्ही सिंधू आणि व्यंकट दत्ता साई लग्नबंधनात अडकणार आहेत.पीव्ही सिंधूच्या लग्नाविषयी तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. लग्नाचे कार्यक्रम २० डिसेंबरपासून सुरू होतील आणि २४  डिसेंबरला दोन्ही कुटुंबे हैदराबादमध्ये रिसेप्शनचे आयोजनही करणार आहेत.






लेक सिटी उदयपूरमध्ये होणार विवाह


पीव्ही सिंधूने १ डिसेंबर रोजी सय्यद मोदी इंटरनॅशनल टूर्नामेंट जिंकून चाहत्यांना आनंदित करून आता तिने सर्वाना डबल सेलिब्रेट करण्याची संधी दिली आहे. सिंधूचे पिता पी.व्ही. रमण्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थामधील ‘लेक सिटी’ (तलावांचं शहर) उदयपूरमध्ये येत्या २२ डिसेंबरला हा लग्न सोहळा होईल. दोघांचंही कुटुंब बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखतं आहे. महिन्याभरापूर्वीच लग्नाचा निर्णय झाला. मात्र सिंधूचं व्यस्त वेळापत्रक पाहता, २२ डिसेंबर ही तारीख लग्नासाठी निश्चित करण्यात आली. २० डिसेंबरपासून लग्नाचे विधी सुरू होतील आणि २२ डिसेंबरला सिंधू आणि वेंकट विधींवत एकमेकांशी लग्नगाठ बांधतील, असेही तिच्या वडिलांनी सांगितले. यानंतर २४ डिसेंबरला हैदराबादमध्ये रिसेप्शन पार्टीचेही आयोजन करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

हिवाळी अधिवेशनाआधी केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक

मुंबई : हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय

स्मृती मानधना-पलाश मुच्छल लग्नाची 'ही' तारीख पंतप्रधानानीचं केली उघड

मुंबई : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबतची चर्चा अनेक दिवसापासून रंगत होती. मात्र आता त्यांच्या

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते