Maharashtra CM: शिंदे दिलदार नेते, महायुती सरकारमध्ये त्यांचा मान राखला गेला पाहिजे - केसरकर

  86

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस झाले आहेत. मात्र अद्याप सरकार स्थापन झालेले नाही की मुख्यमंत्रीपदाची(Maharashtra CM) घोषणा झालेली नाही. तसेच मंत्रिमंडळातील मंत्र्‍यांच्या नावांचीही अद्याप घोषणा झालेली नाही. महायुतीच्या बैठकीबाबत बातमी आली होती मात्र ती बैठक झालीच नाही. एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीचा हवाला देत सर्व बैठका रद्द करण्यात आल्या.


यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पुन्हा दिल्ली दौऱ्याने अनेक सवाल उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रात अद्याप मंत्रिमंडळाबाबत पेच आहे. अनेक मोठ्या विभागांचा फैसला होत नाही आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गट गृह खात्यासह अनेक मोठ्या मंत्रालयांची मागणी करत आहे मात्र अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही.


यातच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर शिवसेना नेते दीपक केसरकर म्हणाले, सरकार तसेही स्थापन होत आहे. शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला ठरलेला आहे. हे चुकीचे आहे की एकनाथ शिंदे यांच्यामुळे सरकार स्थापन होत नाही आहे. भाजपने आज पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची लवकरच घोषणा होईल.



केसरकर पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचा निर्णय अंतिम असेल. गृह खाते एकटे गृहमंत्री सांभाळत नाही. हे खाते मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोन्ही मिळून सांभाळत असतात. राज्यातील गृह खात्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्‍यांकडे असतात. ९९ टक्के शक्यता आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील. एकनाथ शिंदे दिलदार नेते आहेत आणि त्यांचा मानही राखला गेला पाहिजे.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही