Amit shah-Ajit pawar : अजित पवारांना न भेटताच अमित शाह गेले चंदीगडला

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील जनतेला नव्या सरकार स्थापनेची प्रतीक्षा लागून राहिली आहे. नव्या सरकारचे मंत्रीमंडळ कसे असेल, कोण असेल मंत्री, मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर कोण बसेल, उपमुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल या साऱ्याच प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत.


त्याच एनसीपी प्रमुख अजित पवार(Ajit Pawar) हे दिल्लीत गेल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र दिल्लीत अमित शाहांच्या(Amit Shah) भेटीसाठी गेलेल्या अजित पवारांना मात्र ताटकळत राहावे लागले.


सोमवारी अजित पवार अमित शाहांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले होते. मात्र अमित शाह अजित पवांरांना न भेटताच परस्पर चंदीगडला निघून गेले. चंदीगडमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह उपस्थित होते.



अमित शाह चंदीगडला निघून गेल्याने अजित पवारांवर मात्र ताटकळत बसण्याची वेळ आली आहे. इतकंच नव्हे तर अजित पवारांसोबत त्यांचा मुलगा पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. दरम्यान, अमित शाहा यांची भेट न झाल्याने अजित पवार यांना दिल्लीतील मुक्काम वाढवावा लागणार आहे.



राजकीय वर्तुळात चर्चा


एनसीपी प्रमुख अजित पवार हे दिल्लीत गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. एकनाथ शिंदेसोबतच्या बैठका रद्द होत असताना अजित पवार हे दिल्लीला गेल्याने बऱ्याच शंका व्यक्त केल्या जात होत्या.
Comments
Add Comment

मुंबईत अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कार्यक्रम राबवावा; मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई: महाराष्ट्रात लवकरच विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

वांद्रे पश्चिम भागांत शनिवारी, रविवारी पाणीकपात

मुंबई: पाली हिल जलाशयाच्‍या पाणी पातळीत सुधारणा करण्‍यासाठी वांद्रे पश्चिम येथील रामदास नायक मार्ग, स्‍वामी

मुंबईत वर्षभरात ५५ हजार ३९० क्षयरोग रुग्णांची नोंद

मुंबई: मुंबईत महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून क्षय रूग्णांसाठी उच्च दर्जाच्या निदान सेवा, नवीन औषधोपचार

मुंबई महापालिका सभागृहात दिवंगत अलका केरकर यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: मुंबई महापालिकेच्या माजी उपमहापौर आणि प्रभाग क्रमांक ९८च्या भाजप नगरसेविका अलका केरकर यांचे अल्पशा

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पग्रस्त मच्छिमारांना दिलासा; नुकसानभरपाईसाठी विशेष अभ्यासगट स्थापन करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू बांधकाम प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसंदर्भात आज

तीन महिन्यांत संपूर्ण राज्याचे 'ईटीएस' सर्वेक्षण

राज्यातील अवैध उत्खननावर 'एसआयटी'चा हातोडा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा मुंबई :