Maharashtra CM: शिंदे दिलदार नेते, महायुती सरकारमध्ये त्यांचा मान राखला गेला पाहिजे - केसरकर

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस झाले आहेत. मात्र अद्याप सरकार स्थापन झालेले नाही की मुख्यमंत्रीपदाची(Maharashtra CM) घोषणा झालेली नाही. तसेच मंत्रिमंडळातील मंत्र्‍यांच्या नावांचीही अद्याप घोषणा झालेली नाही. महायुतीच्या बैठकीबाबत बातमी आली होती मात्र ती बैठक झालीच नाही. एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीचा हवाला देत सर्व बैठका रद्द करण्यात आल्या.


यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पुन्हा दिल्ली दौऱ्याने अनेक सवाल उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रात अद्याप मंत्रिमंडळाबाबत पेच आहे. अनेक मोठ्या विभागांचा फैसला होत नाही आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गट गृह खात्यासह अनेक मोठ्या मंत्रालयांची मागणी करत आहे मात्र अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही.


यातच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर शिवसेना नेते दीपक केसरकर म्हणाले, सरकार तसेही स्थापन होत आहे. शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला ठरलेला आहे. हे चुकीचे आहे की एकनाथ शिंदे यांच्यामुळे सरकार स्थापन होत नाही आहे. भाजपने आज पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची लवकरच घोषणा होईल.



केसरकर पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचा निर्णय अंतिम असेल. गृह खाते एकटे गृहमंत्री सांभाळत नाही. हे खाते मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोन्ही मिळून सांभाळत असतात. राज्यातील गृह खात्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्‍यांकडे असतात. ९९ टक्के शक्यता आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील. एकनाथ शिंदे दिलदार नेते आहेत आणि त्यांचा मानही राखला गेला पाहिजे.

Comments
Add Comment

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक

Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता मुंबई : महसूल

MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक मुंबई :

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,