Oath Ceremony : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी महायुतीची जय्यत तयारी!

लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रणे, ४० हजार पाहुणे, २२ राज्यांचे येणार मुख्यमंत्री


मुंबई : महायुतीचा मुख्यमंत्री (Maharashtra CM) कोण होणार? यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नसले तरी शपथविधी ५ डिसेंबरला होणार असून त्याची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. आझाद मैदानात हा शपथविधी सोहळा (oath ceremony) पार पडणार आहे. या कार्यक्रमाला लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात येणार आहे. तब्बल ४० हजार निमंत्रितांची जणांची उपस्थिती असेल, असे महायुतीच्या (Mahayuti) मंत्रालयीन सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.



महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या सोहळ्याचं महानियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी जवळपास ४० हजारजणांची उपस्थिती असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडणार आहे. देशातील २२ राज्यांचे मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. लाडक्या बहिणींना यासाठी विशेष आमंत्रण देण्यात येणार आहे. जवळपास दोन हजार व्हीव्हीआयपींच्या पासेसची यासाठी सोय करण्यात येणार आहे.



कशी असेल आसन व्यवस्था?


आझाद मैदानात (Mumbai Azad Maidan) १३ विशेष ब्लॉकमध्ये लोकांच्या बसण्याची व्यवस्था असणार आहे. यामध्ये तीन स्टेजची उभारणी केली जाणार आहे. एक मुख्य स्टेज आणि दोन त्याच्या आजूबाजूला छोट्या स्टेजची उभारणी केली जाणार आहे. विविध धर्माचे संत-महंत, भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांची यात उपस्थिती असेल. संत महंतांसाठी वेगळ्या स्टेजची उभारणी केली जाणार आहे. खासदार आणि आमदारांसाठी देखील वेगळी आसनव्यवस्था केली जाणार आहे. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसाठी देखील वेगळी आसन व्यवस्था असणार आहे.



अमित शहांनी मागविले आमदारांचे रिपोर्ट कार्ड


भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने मंत्रीपदासाठी अटी जाहीर केल्या आहेत. या अटी पूर्ण करणाऱ्यांना मंत्रीपदे मिळणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्रिमंडळात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या आमदारांचे रिपोर्ट कार्ड मागवले आहेत. लोकसभा निवडणुकीत संबंधित आमदाराची कामगिरी कशी होती, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संबंधित व्यक्तीने प्रामाणिकपणे काम केले का? हे पाहणे बाकी आहे. मंत्रिमंडळात इच्छूक माजी मंत्री असतील, तर महायुती सरकारच्या काळात संबंधित मंत्र्याने मंत्रालयात कशी काय सेवा केली? संबंधित व्यक्ती किती वेळ मंत्रालयात काम करत होती. महायुतीतील त्यांच्या घटक पक्षाच्या आमदारांशी मंत्र्याची वागणूक कशी होती? मंत्र्यांनी केंद्र आणि राज्याच्या निधीचे वाटप कसे केले? संबंधित मंत्री युती धोक्यात घालतील अशी परिस्थिती होती का? त्यांनी काही वादग्रस्त विधान केले होते का? या मुद्द्यांचे रिपोर्ट कार्ड घेऊन अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्लीत बोलावले आहे.



निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी महाराष्ट्रासाठी भाजपाचे निरीक्षक


भाजपाने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची महाराष्ट्राचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. हे केंद्रीय निरीक्षक मंगळवारी राज्यात येणार असून ४ डिसेंबरला भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे. भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यासाठी केंद्रीय निरीक्षक उद्या मुंबईत दाखल होतील. याकडे भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांचे डोळे लागले आहेत. दरम्यान, येथील आझाद मैदानावर सध्या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी प्रशासनाने चालवली आहे.

Comments
Add Comment

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

औद्योगिक क्षेत्राला अपेक्षित कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम सारथीने सुरू करावेत : विखे पाटील

मुंबई : उद्योजकांच्या संघटनांशी संपर्क ठेवून औद्योगिक व सेवा क्षेत्रात मागणी असलेल्या कौशल्य प्रशिक्षणाचे

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,