Plastic Ban : अजूनही प्लॅस्टिक पिशव्या वापरताय, सावधान! होणार कठोर कारवाई

पिंपरी : केंद्र सरकारच्या (Central Government) पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने प्लॅस्टिक वेस्ट मॅनेजमेंटने जारी केलेल्या नियमानुसार प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यास बंदी (Plastic Ban) घातली आहे. आरोग्याला घातक तसेच पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचण्याला कारणीभूत ठरणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर काही वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आली होती. मात्र अजूनही कित्येक जण प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरताना दिसून येतात. त्यामुळे आता पालिका प्रशासन पुन्हा अ‍ॅक्शन मोडवर आली आहे.



महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने ‘महाराष्ट्र प्लॅस्टिक व थर्मोकोल अविघटनशील वस्तूंच्या (उत्पादन, वापर विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक व तद्नंतर वेळोवेळी केलेल्या सुधारणा) अधिसूचना, २०१८’ संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने ३० सप्टेंबर २०२१ पासून ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या आणि ३१ डिसेंबर २०२२ पासून १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी करण्यात आली आहे. या नियम व अधिसूचनेची कठोर अंमलबजावणी शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री व खरेदी होत आहे. त्यामुळे सरकारने ठरवून दिलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्त सिंह यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात