ठाण्यात काँग्रेसला धक्का, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

ठाणे : ठाणे कळवा पूर्व घोलई नगर येथील काँग्रेसचे सामाजिक न्याय ठाणे शहर अध्यक्ष जगदीश गौरी व असंघटित कामगार ठाणे शहर सचिव दिनेश शिळकर यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह आज भाजप मध्ये प्रवेश केला, ठाणे काँग्रेसला आता गळती लागली आहे, ह्या अगोदर काँग्रेसचे मनोज शिंदे हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले, तर आज जगदीश गौरी भाजप वाशी झाले,

आज सकाळी ११ वाजता आपल्या असंख्य समर्थक व कार्यकर्त्यांसह वर्तक नगर येथील भाजप कार्यालयात दाखल झाले, भाजपचे कामगार मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रशांत तळवडेकर यांच्या पुढाकाराने आणो भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या उपस्थितीत जगदीश गौरी यांचा पक्ष प्रवेश झाला, काँग्रेस मध्ये असताना आमची कुठलीही काम होत नव्हती, काँग्रेसच्या गटातटाच्या राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला होता, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे जगदीश गौरी यांनी सांगितले.


त्यांच्यासोबत काँग्रेसचे असंघटित कामगार ठाणे शहर सचिव दिनेश शिळकर सामाजिक न्याय विभाग ठाणे शहर सचिव संदीप सूर्यवंशी, सुशांत धुळप, वार्ड अध्यक्ष संतोष झिमल, काँग्रेस कार्यकर्ते भरत पाटील, मंगेश तळेगावकर, विजय कासार, पुजारी यादव, रवी Army नितेश सूर्यवंशी महेश सूर्यवंशी व महिला कार्यकर्त्यां सहभागी होत्या, तर भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, ठाणे सरचिटणीस मनोहर सुगदरे, मंडळ अध्यक्ष सुदर्शन साळवी कार्यकारणी सदस्य अरविंद कलवार, प्रभाग सदस्य गजानन परब, भाजप कामगार मोर्चा सचिव प्रशांत तळवडेकर, उत्तर भारती मोर्चा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत यादव, दिव्यांग सेल सचिव आमिन मिश्रा, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य हर्षला ताई बुबेरा कळवा मंडळ अध्यक्ष भूषण म्हात्रे, कळवा मंडळ अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा नरेश गायकवाड उपस्थित होते.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये