Gautam Adani : पुढे जायचे तर किंमत मोजावीच लागते!

अमेरिकेतील आरोपानंतर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले


जयपूर : अमेरिकेतील प्रकरणात अदानी पक्षाकडून कुणावरही एफसीपीएचे उल्लंघन अथवा न्यायात अडथळा आणण्याच्या कोणत्याही षडयंत्राचा आरोप करण्यात आलेला नाही, असे स्वत: अदानी समूहाचे अध्यक्ष आणि भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी सांगितले आहे.



पुरस्कार सोहळ्यावेळी अदानी म्हणाले, तुमच्यापैकी बहुतेकांनी हे वाचले असेल की दोन आठवड्यांपूर्वी आम्हाला अदानी ग्रीन एनर्जीमध्ये अनुपालन पद्धतींसंदर्भात अमेरिकेकडून आरोपांचा सामना करावा लागला. अशा आव्हानांना सामोरे जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मी आपल्याला सांगतो की, प्रत्येक आव्हान आपल्याला मजबूत बनवते. प्रत्येक अडथळा अदानी समूहासाठी पायरी बनतो.


आजच्या जगात फॅक्ट्सच्या तुलनेत निगेटिव्हिटी अधिक वेगाने पसरते. आम्ही कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे काम करत आहोत. मात्र, गेल्या काही वर्षांत आम्हाला ज्या अडथळ्यांचा सामना करावा लागत, ती आमच्या प्रगतीची किंमत आहे. आपली स्वप्न जेवढे धाडसी असतील, तेवढेच जग तुमची अधिक छाननी करेल. प्रत्येक राजकीय विरोधक आम्हाला आणखी बळ देतो.



काय आहेत आरोप


अमेरिकेतील न्युयॉर्कच्या एका न्यायालयात, गौतम अदानींसह सात जणांवर पुढील २० वर्षांत २ अब्ज डॉलर किंमतीचे सोलर पॉवर प्रोजेक्ट मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना २६५ दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक (सुमारे २२५० कोटी रुपये) लाच दिल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, अदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी