Gautam Adani : पुढे जायचे तर किंमत मोजावीच लागते!

अमेरिकेतील आरोपानंतर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले


जयपूर : अमेरिकेतील प्रकरणात अदानी पक्षाकडून कुणावरही एफसीपीएचे उल्लंघन अथवा न्यायात अडथळा आणण्याच्या कोणत्याही षडयंत्राचा आरोप करण्यात आलेला नाही, असे स्वत: अदानी समूहाचे अध्यक्ष आणि भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी सांगितले आहे.



पुरस्कार सोहळ्यावेळी अदानी म्हणाले, तुमच्यापैकी बहुतेकांनी हे वाचले असेल की दोन आठवड्यांपूर्वी आम्हाला अदानी ग्रीन एनर्जीमध्ये अनुपालन पद्धतींसंदर्भात अमेरिकेकडून आरोपांचा सामना करावा लागला. अशा आव्हानांना सामोरे जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मी आपल्याला सांगतो की, प्रत्येक आव्हान आपल्याला मजबूत बनवते. प्रत्येक अडथळा अदानी समूहासाठी पायरी बनतो.


आजच्या जगात फॅक्ट्सच्या तुलनेत निगेटिव्हिटी अधिक वेगाने पसरते. आम्ही कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे काम करत आहोत. मात्र, गेल्या काही वर्षांत आम्हाला ज्या अडथळ्यांचा सामना करावा लागत, ती आमच्या प्रगतीची किंमत आहे. आपली स्वप्न जेवढे धाडसी असतील, तेवढेच जग तुमची अधिक छाननी करेल. प्रत्येक राजकीय विरोधक आम्हाला आणखी बळ देतो.



काय आहेत आरोप


अमेरिकेतील न्युयॉर्कच्या एका न्यायालयात, गौतम अदानींसह सात जणांवर पुढील २० वर्षांत २ अब्ज डॉलर किंमतीचे सोलर पॉवर प्रोजेक्ट मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना २६५ दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक (सुमारे २२५० कोटी रुपये) लाच दिल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, अदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Comments
Add Comment

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर