Gautam Adani : पुढे जायचे तर किंमत मोजावीच लागते!

  57

अमेरिकेतील आरोपानंतर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले


जयपूर : अमेरिकेतील प्रकरणात अदानी पक्षाकडून कुणावरही एफसीपीएचे उल्लंघन अथवा न्यायात अडथळा आणण्याच्या कोणत्याही षडयंत्राचा आरोप करण्यात आलेला नाही, असे स्वत: अदानी समूहाचे अध्यक्ष आणि भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी सांगितले आहे.



पुरस्कार सोहळ्यावेळी अदानी म्हणाले, तुमच्यापैकी बहुतेकांनी हे वाचले असेल की दोन आठवड्यांपूर्वी आम्हाला अदानी ग्रीन एनर्जीमध्ये अनुपालन पद्धतींसंदर्भात अमेरिकेकडून आरोपांचा सामना करावा लागला. अशा आव्हानांना सामोरे जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मी आपल्याला सांगतो की, प्रत्येक आव्हान आपल्याला मजबूत बनवते. प्रत्येक अडथळा अदानी समूहासाठी पायरी बनतो.


आजच्या जगात फॅक्ट्सच्या तुलनेत निगेटिव्हिटी अधिक वेगाने पसरते. आम्ही कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे काम करत आहोत. मात्र, गेल्या काही वर्षांत आम्हाला ज्या अडथळ्यांचा सामना करावा लागत, ती आमच्या प्रगतीची किंमत आहे. आपली स्वप्न जेवढे धाडसी असतील, तेवढेच जग तुमची अधिक छाननी करेल. प्रत्येक राजकीय विरोधक आम्हाला आणखी बळ देतो.



काय आहेत आरोप


अमेरिकेतील न्युयॉर्कच्या एका न्यायालयात, गौतम अदानींसह सात जणांवर पुढील २० वर्षांत २ अब्ज डॉलर किंमतीचे सोलर पॉवर प्रोजेक्ट मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना २६५ दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक (सुमारे २२५० कोटी रुपये) लाच दिल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, अदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या