लातूरमध्ये कुंटणखाना चालवणारी महिला अटकेत, दोन पीडित महिलांची सुटका

  92

लातूर : लातूर शहरातील बार्शी रोड परिसरामध्ये एक महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरून स्त्रियांना बोलावून घेऊन 'डायमंड स्पा'च्या नावाखाली त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेत होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी कुंटणखाना चालवणा-या महिलेला अटक केली असून दोन पीडित महिलांची सुटका केली आहे.


सदर माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबिता वाकडकर यांच्या नेतृत्वात एएचटीयु पथकाने बनावट ग्राहक पाठवून मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळून ती खरी असल्याचे निदर्शनास येताच लातूर शहरातील बार्शी रोड परिसरातील "डायमंड स्पा" वर छापा मारला. त्याठिकाणी देहविक्री करीत असताना दोन पिडीत महिला व कुंटणखाना चालवणारी एक महिला आढळून आली.



पिडीत महिलांकडून देहविक्रय व्यवसाय करून घेणारे, स्वतःच्या फायद्यासाठी बाहेरगावच्या महिलांना स्वतःचे स्पा मध्ये ठेवून त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून स्पा च्या नावाखाली वेश्या व्यवसाय करून घेतात व आम्हाला काही रक्कम देऊन आमची राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करतात असे पीडित महिलांनी सांगितले.


सदर प्रकाराबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेला अटक केली आहे.


सदर कारवाईत पोलीस निरीक्षक बबिता वाकडकर, पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख, सुभाष सूर्यवंशी, हवालदार सदानंद योगी, प्रकाश जाधव, महिला हवालदार सुधामती यादव आणि निहाल मनियार यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर देडे करीत आहेत.

Comments
Add Comment

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक

Pratap Sarnaik: आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था

एसटी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करणार - प्रताप सरनाईक  मुंबई: आषाढी एकादशी निमित्त श्री.

Monsoon Update : विदर्भात मान्सून निराशाजनक; नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये? शेतकरी चिंताग्रस्त!

नागपूर : विदर्भात यंदा मान्सूनचे अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस लवकर आगमन झाल्यानंतर शेतकरी व सामान्य जनतेला

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी

वारीतलं रिंगण : चैतन्य फुलवणारा सोहळा!

इंदापूर : आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आहे विश्वासाची, भक्तीची आणि नित्य उत्साहाची