Sanjay Shirsat : ...यावर एकनाथ शिंदे लवकरच मोठा निर्णय घेणार!

आमदार संजय शिरसाट यांचे वक्तव्य


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रि‍पदाबाबत चर्चा सुरु असताना भाजपाचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री होणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केली आहे. मात्र त्यांची ही मागणी जोर धरत नसल्यामुळे राजकीय रिंगणात पेच वाढत चालला आहे. अशातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.



एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना संजय शिरसाट यांनी म्हटले की, राजकीय पेचप्रसंग आला तर विचारासाठी वेळ हवा असेल तर शिंदे त्यांच्या गावी जाण्याला प्राधान्य देतात. ते त्यांच्या दरे या गावी जातात. या गावात फोनही लागत नाही. आरामात विचार करून निर्णय घ्यायचा असेल तर शिंदे त्यांच्या गावी जातात. पण आज सायंकाळपर्यंत ते नक्कीच मोठा निर्णय घेतील, असे वक्तव्य आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मांडले.


दरम्यान, महायुतीची होणारी बैठक दोन दिवसांनी अमित शाह यांचा फोन आल्यानंतर होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या गावी निघून गेल्यानेच बैठक पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा