Sanjay Shirsat : ...यावर एकनाथ शिंदे लवकरच मोठा निर्णय घेणार!

आमदार संजय शिरसाट यांचे वक्तव्य


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रि‍पदाबाबत चर्चा सुरु असताना भाजपाचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री होणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केली आहे. मात्र त्यांची ही मागणी जोर धरत नसल्यामुळे राजकीय रिंगणात पेच वाढत चालला आहे. अशातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.



एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना संजय शिरसाट यांनी म्हटले की, राजकीय पेचप्रसंग आला तर विचारासाठी वेळ हवा असेल तर शिंदे त्यांच्या गावी जाण्याला प्राधान्य देतात. ते त्यांच्या दरे या गावी जातात. या गावात फोनही लागत नाही. आरामात विचार करून निर्णय घ्यायचा असेल तर शिंदे त्यांच्या गावी जातात. पण आज सायंकाळपर्यंत ते नक्कीच मोठा निर्णय घेतील, असे वक्तव्य आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मांडले.


दरम्यान, महायुतीची होणारी बैठक दोन दिवसांनी अमित शाह यांचा फोन आल्यानंतर होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या गावी निघून गेल्यानेच बैठक पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील

Maharashtra Village: राज्य सरकारकडून सहा ग्रामपंचायतींचा सन्मान केला जाणार; कोकणातील 'हे' गाव पहिल्या क्रमांकावर

मुंबई: गावाचा विकास हाच देशाचा विकास असं म्हटलं जातं. सध्या आपल्या देश लोकल ते ग्लोबल अशा मार्गाने काम करीत आहे.

Thane: ठाण्यात खळबळ, वेब सिरिज अभिनेत्रीच्या देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांकडून रॅकेटचा भांडाफोड

ठाणे: सिने इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याकारणाने एका हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने पैसे