मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा सुरु असताना भाजपाचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री होणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केली आहे. मात्र त्यांची ही मागणी जोर धरत नसल्यामुळे राजकीय रिंगणात पेच वाढत चालला आहे. अशातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना संजय शिरसाट यांनी म्हटले की, राजकीय पेचप्रसंग आला तर विचारासाठी वेळ हवा असेल तर शिंदे त्यांच्या गावी जाण्याला प्राधान्य देतात. ते त्यांच्या दरे या गावी जातात. या गावात फोनही लागत नाही. आरामात विचार करून निर्णय घ्यायचा असेल तर शिंदे त्यांच्या गावी जातात. पण आज सायंकाळपर्यंत ते नक्कीच मोठा निर्णय घेतील, असे वक्तव्य आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मांडले.
दरम्यान, महायुतीची होणारी बैठक दोन दिवसांनी अमित शाह यांचा फोन आल्यानंतर होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या गावी निघून गेल्यानेच बैठक पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…