Narayan Rane : सिंधुदुर्ग ते मुंबई विमानसेवा पुन्हा सुरु करा!

  85

खासदार नारायण राणे यांची वाहतूक मंत्र्यांकडे मागणी


मुंबई : मुंबईहून थेट तळकोकणात जाण्यासाठी तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सिंधुदुर्ग ते मुंबई विमानसेवा (Mumbai-Sindhudurga Airport) सुरू करण्यात आली होती. मात्र २६ ऑक्टोबर रोजी मुदत संपल्यानंतर चिपी-मुंबई विमानसेवा बंद करण्यात आली. परंतु लाखो पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या या विमानसेवेला कोकणवासीयांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी ही विमानसेवा पुन्हा सुरु करावी अशी मागणी नागरी विमान वाहतूक मंत्र्याकडे केली आहे.



खा. नारायण राणे यांनी वाहतूक मंत्र्यांकडे विमानसेवेबाबत जारी केलेल्या निवेदनानुसार मुंबई – चिपी (सिंधुदुर्ग विमानतळ) अशी कार्यान्वित असलेली सेवा खूप चांगली होती. सणासुदीच्या काळात तसेच अन्य वेळीही मोठा फायदा प्रवाशांना आणि पर्यायाने कंपनीला होत असायचा. हंगामाच्या वेळी तर एका मार्गासाठी २५ हजारापर्यंत तिकीट देऊन प्रवाशांनी प्रवास केला आहे. या दरम्यान कधीकधी हवामान, तसेच अन्य तांत्रीक कारणामुळे विमानसेवा विस्कळीत झाल्याने त्याचा फटका प्रवाशीसंख्येवरही झाला. परंतु फ्लाइट नेहमीच बुक केल्या गेल्या.


पर्यटक, स्थानिक प्रवासी आणि जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला गती मिळावी यासाठी सिंधुदुर्ग विमानतळावरील सेवा त्वरीत कार्यरत व्हावी, अशी मागणीही खा. नारायण राणे (Narayan Rane) यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के.राम मोहन नायडू (Ram Mohan Naidu) यांच्याकडे केली आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला

Amravati News : भयानक...अमरावतीत १३ फूट लांबीच्या अजगराने घेतला बकरीचा जीव

अमरावती : तालुक्यातील सुरवाडी खुर्द शेत शिवार परिसरात एका १३ फूट लांबीच्या अजगराने २० किलो वजनाची बकरी

चोरांनी मोबाईल टॉवर्सनाही सोडले नाही! लातूरमध्ये नेटवर्क मशीन्स चोरल्याप्रकरणी तिघांना अटक

लातूर: चोर काय चोरतील काही सांगता येत नाही, साखळी चोर, मोबाइल चोरपासून तर बरेच आहेत पण लातूर जिल्ह्यामधील

वस्तीगृहातील तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडून १२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू, पोलिस तपासाला सुरुवात

Nanded: नांदेड येथे एका १२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वस्तीगृहातील तिसऱ्या मजल्यावरुन खाली

मुलांची मज्जा! ८ आणि ९ जुलैला राज्यातील सर्व शाळांना सुट्टी! पण कारण काय?

मुंबई : राज्यातील सर्वच शाळांना येत्या ८ आणि ९ जुलै २०२५ रोजी दोन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. राज्य सरकारच्या