Narayan Rane : सिंधुदुर्ग ते मुंबई विमानसेवा पुन्हा सुरु करा!

खासदार नारायण राणे यांची वाहतूक मंत्र्यांकडे मागणी


मुंबई : मुंबईहून थेट तळकोकणात जाण्यासाठी तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सिंधुदुर्ग ते मुंबई विमानसेवा (Mumbai-Sindhudurga Airport) सुरू करण्यात आली होती. मात्र २६ ऑक्टोबर रोजी मुदत संपल्यानंतर चिपी-मुंबई विमानसेवा बंद करण्यात आली. परंतु लाखो पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या या विमानसेवेला कोकणवासीयांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी ही विमानसेवा पुन्हा सुरु करावी अशी मागणी नागरी विमान वाहतूक मंत्र्याकडे केली आहे.



खा. नारायण राणे यांनी वाहतूक मंत्र्यांकडे विमानसेवेबाबत जारी केलेल्या निवेदनानुसार मुंबई – चिपी (सिंधुदुर्ग विमानतळ) अशी कार्यान्वित असलेली सेवा खूप चांगली होती. सणासुदीच्या काळात तसेच अन्य वेळीही मोठा फायदा प्रवाशांना आणि पर्यायाने कंपनीला होत असायचा. हंगामाच्या वेळी तर एका मार्गासाठी २५ हजारापर्यंत तिकीट देऊन प्रवाशांनी प्रवास केला आहे. या दरम्यान कधीकधी हवामान, तसेच अन्य तांत्रीक कारणामुळे विमानसेवा विस्कळीत झाल्याने त्याचा फटका प्रवाशीसंख्येवरही झाला. परंतु फ्लाइट नेहमीच बुक केल्या गेल्या.


पर्यटक, स्थानिक प्रवासी आणि जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला गती मिळावी यासाठी सिंधुदुर्ग विमानतळावरील सेवा त्वरीत कार्यरत व्हावी, अशी मागणीही खा. नारायण राणे (Narayan Rane) यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के.राम मोहन नायडू (Ram Mohan Naidu) यांच्याकडे केली आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये