Election Commission : निवडणूक आयोगाचे काँग्रेसला चर्चेचे निमंत्रण

  71

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रिया २३ नोव्हेंबरला पार पडली. यानंतर विरोधी पक्षातील बहुतांशी उमेदवारांनी ईव्हएमवर शंका उपस्थित केली. त्यानंतर अनेक उमेदवारांनी आयोगाकडे फेरमतमोजणीची मागणी केली होती. या मागणीला केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) उत्तर दिले आहे.


महाराष्ट्र निवडणूक मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. या आरोपांवर चर्चा करण्यासाठी आयोगाने ३ डिसेंबर रोजी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला आमंत्रित केले आहे. सर्व कायदेशीर शंकांचे निरसन करणार असून विधानसभा निवडणूक ही पारदर्शक झाली आहे.



निवडणूकीच्या प्रत्येक टप्प्यावर उमेदवार/त्यांच्या एजंटांच्या सहभागासह पारदर्शक प्रक्रियेचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. राजकीय पक्षांच्या सहभागासह पारदर्शक मतदार यादी अद्ययावत प्रक्रिया केली आहे. वैयक्तिकरित्या प्रत्येक उमेदवाराचे लेखी ऐकल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या सर्व समस्यांचे कायदेशीररित्या पूर्तता करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) दिले आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता