Millet Bread : दरवाढीचा दणका; चपाती पेक्षा बाजरीची भाकरी महाग!

वाडा : थंडी पडण्यास सुरुवात झाल्याने आता अनेकांनी आहारात बदल केला आहे. थंडीत अंगात उभ राहावी, यासाठी बाजरीची भाकरी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. त्यामुळे सध्या बाजरीची भाकरी महाग (Millet Bread) झाली असून, दरही वाढले आहेत. थंडी वाढल्याने बाजरीची मागणी वाढली आहे. बाजरी गावरान क्विंटल दर हा कमाल २९०० किमान ३२०० एवढा आहे. संकरित बाजरी किमान ३००० ते ३२०० आहे. महिको किमान ३१०० कमाल ३५०० एवढा क्विंटल दर आहे. तालुक्यात बाजरीच्या भाकऱ्या कमी खातात. तरीसुद्धा थंडीत बाजरी भाकरी खाण्याचे प्रमाण अधिक असते. वाड्यात इतर जिल्ह्यातून बाजरी येते.



बाजरीत मॅग्नेशियम, पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे शरीराबरोबरच हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. बाजरी मधुमेहाच्या रुग्णासाठी ही फायदेशीर ठरते. बाजरीतील पोषक तत्व डायबेटिसच्या रुग्णासाठी फायदेशीर ठरतात. आठवड्यातून दोन ते तीन दिवस बाजरीची भाकरी खाल्ल्यास तब्येत चांगली राहण्यास मदत होईल. सध्या थंडीचा हंगाम सुरू झाला आहे तालुक्यात थंडी चांगलीच पडू लागली आहे. त्यामुळे थंडीत अंगात उब राहावी, यासाठी बाजरीची भाकरी खाल्ली जाते, थंडीमुळे बाजरीची मागणी बाजारात वाढली आहे.


गव्हाचे दर प्रति किलो ३५ ते ४० रुपये आहे. क्विंटल मागे २५००रुपये दर आहे. गव्हापासून पीठ तयार करून त्याची चपाती केली जाते. सध्या थंडी असल्याने गव्हा एवजी बाजरीचे पीठ घेण्याकडे कल वाढला आहे. झटपट तयार होणारी आणि आरोग्यास कोणताही अपाय न करणारी असल्याने बाजरीकडे कल असतो. बाजरी कमी साहित्यात आणि लवकर तयार होते. त्यामुळे बाजरीला मोठी मागणी आहे. २२०० ते २८०० पर्यंत दर बाजरीला मिळत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास