Millet Bread : दरवाढीचा दणका; चपाती पेक्षा बाजरीची भाकरी महाग!

वाडा : थंडी पडण्यास सुरुवात झाल्याने आता अनेकांनी आहारात बदल केला आहे. थंडीत अंगात उभ राहावी, यासाठी बाजरीची भाकरी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. त्यामुळे सध्या बाजरीची भाकरी महाग (Millet Bread) झाली असून, दरही वाढले आहेत. थंडी वाढल्याने बाजरीची मागणी वाढली आहे. बाजरी गावरान क्विंटल दर हा कमाल २९०० किमान ३२०० एवढा आहे. संकरित बाजरी किमान ३००० ते ३२०० आहे. महिको किमान ३१०० कमाल ३५०० एवढा क्विंटल दर आहे. तालुक्यात बाजरीच्या भाकऱ्या कमी खातात. तरीसुद्धा थंडीत बाजरी भाकरी खाण्याचे प्रमाण अधिक असते. वाड्यात इतर जिल्ह्यातून बाजरी येते.



बाजरीत मॅग्नेशियम, पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे शरीराबरोबरच हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. बाजरी मधुमेहाच्या रुग्णासाठी ही फायदेशीर ठरते. बाजरीतील पोषक तत्व डायबेटिसच्या रुग्णासाठी फायदेशीर ठरतात. आठवड्यातून दोन ते तीन दिवस बाजरीची भाकरी खाल्ल्यास तब्येत चांगली राहण्यास मदत होईल. सध्या थंडीचा हंगाम सुरू झाला आहे तालुक्यात थंडी चांगलीच पडू लागली आहे. त्यामुळे थंडीत अंगात उब राहावी, यासाठी बाजरीची भाकरी खाल्ली जाते, थंडीमुळे बाजरीची मागणी बाजारात वाढली आहे.


गव्हाचे दर प्रति किलो ३५ ते ४० रुपये आहे. क्विंटल मागे २५००रुपये दर आहे. गव्हापासून पीठ तयार करून त्याची चपाती केली जाते. सध्या थंडी असल्याने गव्हा एवजी बाजरीचे पीठ घेण्याकडे कल वाढला आहे. झटपट तयार होणारी आणि आरोग्यास कोणताही अपाय न करणारी असल्याने बाजरीकडे कल असतो. बाजरी कमी साहित्यात आणि लवकर तयार होते. त्यामुळे बाजरीला मोठी मागणी आहे. २२०० ते २८०० पर्यंत दर बाजरीला मिळत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

Missing Link' Project: मुंबई-पुण्यातील अंतर कमी होणार, 'मिसिंग लिंक'चं काम पूर्ण; लवकरच प्रवाशांसाठी खुला

मुंबई: बहुप्रतीक्षित मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचं काम पूर्ण झालं आहे. या प्रोजेक्टशी संबंधित असलेल्या एक

कागलमध्ये ३५७.९९ कोटींचा एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान व केंद्रीय मंत्री गडकरींचे आभार व्यक्त

कोल्हापूर: कोल्हापूरच्या कागल येथे राष्ट्रीय महामार्ग-48 वर 6-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळाली आहे.३५७.९९

PM Surya Ghar yojana : 'पंतप्रधान सूर्य घर' योजनेत महाराष्ट्राची बाजी

- उत्तर प्रदेश, गुजरातला टाकले मागे; चार महिन्यांत १ लाख ८ हजार घरांवर सौर यंत्रणा मुंबई : स्वच्छ आणि शाश्वत

भव्य राष्ट्रध्वज नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल - मुख्यमंत्री फडणवीस

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी २२,१८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

- त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा - मुख्यमंत्री फडणवीस त्र्यंबक - नाशिक मध्ये सिंहस्थ

धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण