Vinod Tawde : विनोद तावडे 'गेमचेंजर'! अमित शाहांसोबत रात्रीच्या बैठकीत नेमकी कोणती खलबतं झाली?

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला जनादेश मिळाल्यानमतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाभोवती चर्चेने फेर धरला असतानाच भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची बुधवारी (२७ नोव्हेंबर) रात्री बैठक झाली. या भेटीत नेमकी काय झाली चर्चा, यावर आता राज्यात जोरदार चर्चा रंगलीय.


भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात तब्बल ४० मिनिटे महत्त्वाची बैठक झाली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद आणि मराठा समीकरण यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.



या बैठकीत महाराष्ट्रात मराठेत्तर मुख्यमंत्री बनवल्यास मराठा समाज नाराजी होण्याची चिंता भाजपाला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवले गेले, तर मराठा मतपेढी कशापद्धतीने भाजपासोबत एकसंध ठेवता येईल, यावर चर्चा झाल्याचे समजते.


देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केल्यास मराठा मतं कशी टिकवता येतील, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, देवेंद्र फडणवीसांचा चेहरा आणि मराठा-ओबीसी मतं, यावर दोघांमध्ये खलबतं झाली. २०१४ ते २०२४ या काळात मराठा समाजाची आंदोलनं, मराठा नेत्यांच्या भूमिका आणि कोर्टाचे निकाल शाहांनी जाणून घेतले. पक्षाच्या भविष्यासाठी मराठा चेहरा किती महत्त्वाचा आहे, याबाबतही राजकीय आकडेमोड करण्यात आली.


काल एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रि‍पदावरील दावा सोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यानंतर आता शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे महायुतीचे नेते अंतिम निर्णयासाठी आज गुरुवारी दिल्लीला जाणार आहेत. आता मोदी-शाह कोणता निर्णय देतात या बाबत कमालीची उत्सुकता आहे.

Comments
Add Comment

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या