Navneet Rana : दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, नवनीत राणांनी बच्चू कडूंना डिवचलं

  154

मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातून चारवेळा निवडून आलेल्या प्रहार संघटनेचे प्रमुख, बच्चू कडू यांना यंदा पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे बच्चू कडू यांचे कट्टर विरोधक रवी राणा (Ravi Rana) हे विजयी झाले असून राणा दाम्पत्यामुळे बच्चू कडू यांचा पराभव झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीचं चर्चा रंगली आहे. अमरावतीत बच्चू कडू यांच्या पराभवामागे राणा दाम्पत्य असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, मला पाडण्याची राणा दाम्पत्याची लायकी नाही, असा हल्लाबोल बच्चू कडू यांनी केला होता. याला माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर देताना कडू यांना डिवचलं आहे.



दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं


नवनीत राणा म्हणाल्या की, हे माझे श्रेय नाही आहे. या निवडणुकीत माझ्या जनतेने बदला घेतलाय. दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, असे म्हणत त्यांनी बच्चू कडूंना डिवचलं आहे. मी लहान आहे. पण, आता कसं वाटतं, तुमची औकात काढली. स्वतःच्या मतदारसंघात दिवे लावले नाही, दुसरीकडे काय लावणार? अशी घणाघाती टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याबाबत प्रश्न विचारले असता मी त्यांना शुभेच्छा द्यायला आली होती. अपेक्षित निकालापेक्षा जास्त निकाल आला आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार, असे मला वाटते. आम्ही देवेंद्रजींचे सैनिक आहोत, असं नवनीत राणा यांनी म्हटले.



मी पाच वर्षानंतर बच्चू कडू यांचे आव्हान स्वीकारेन...


बच्चू कडूंच्या टीकेवर रवी राणा म्हणाले, “आम्हाला श्रेय घेण्याची गरज नाही. त्यांना लोकांनी हटवलं आहे. ‘बच्चू कडू हटाव’ हा नारा लोकांनी दिला. त्यांनी म्हटलं होतं, ‘मी मुख्यमंत्री होईल.’ मात्र, त्यांनी आता बोलणं बंद करायला हवे. मी पाच वर्षानंतर बच्चू कडू यांचे आव्हान स्वीकारेन. ते सांगतील तिथे मी उभा राहीन. कडू कुणाच्या तरी पक्षात प्रवेश करतील. लोकसभेला त्यांनी मतांचे विभाजन केले. त्यामुळे जनतेने त्यांचा बदला घेतला.”


Comments
Add Comment

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल