Maharashtra Government Formation : महाराष्ट्राचे ३ प्रमुख नेते तातडीने दिल्लीकडे रवाना

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचं सरकार कोणाच्या हाती येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे राजकारण आता चांगलंच रंगले आहे. एकतर्फी निकाल महायुतीच्या बाजूने लागल्यानंतरसुद्धा लवकर सत्तास्थापनेबाबत दावा केला नाही. भाजपने १३४ जागांवर विजय मिळवून सर्वांत मोठा पक्ष असल्याचं सिद्ध केले. त्यामुळे आता मुख्यमंत्री हा भाजपचाच असावा असा दावा सर्व भाजप नेत्यांकडून केला जात आहे. मात्र आता घडामोडींना वेग आला असून राज्यातील महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते तातडीने दिल्लीकडे रवाना झाले आहेत.


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा २३ नोव्हेंबर रोजी निकाल हाती आला. यामध्ये महायुतीचा भरघोस विजय पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. तर विरोधी पक्ष नेतापदावर दावा करण्याएवढे देखील संख्याबळ विरोधकांना मिळवता आलेला नाही. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. मात्र महायुतीने संपूर्ण बहुमत हाती मिळवून देखील लवकर सत्तास्थापनेचा दावा न केल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोठ उठवली होती. आता मात्र लवकरच राज्यामध्ये सरकार स्थापन होणार असून यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे व अजित पवार हे दिल्लीकडे रवाना झाले आहेत.



दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला जाणार आहे. यापूर्वी निवडणुकीच्या जागावाटप व फॉर्मुला ठरवण्यावेळी नेत्यांनी दिल्लीवारी केली आहे. भाजपचे पक्षश्रेष्ठी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी नेते भेट घेणार आहेत. त्यामुळे आता अमित शाह यांच्याशी चर्चा करुन महाराष्ट्राच्या सरकारस्थापन आणि मंत्रीपदाचे वाटप याची चर्चा होणार आहे.



यावेळी देखील महायुतीच्या पूर्वीच्या सरकारप्रमाणे एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. अजित पवार यांनी यापूर्वीच मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला होता. तर एकनाथ शिंदे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला आहे. यामुळे आता मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल हे स्पष्ट झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहे. यासाठी भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देखील पाठिंबा आहे. मात्र आता दिल्लीतील बैठकीमध्ये भाजप पक्षश्रेष्ठी नक्की काय निर्णय घेतात याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Comments
Add Comment

COVID-19 Variant : आंध्र प्रदेशमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार सक्रीय झाल्याची शक्यता, दोन मृत्यूंनी खळबळ

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाची लागण झाल्याने दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. २०२२ नंतर पहिल्यांदाच

Madhya Pradesh : धार येथील भोजशाळा वाग्देवी मंदिरच, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

मुस्लिमांसाठी पर्यायी नमाजस्थळाची व्यवस्था करण्याचे निर्देश नवी दिल्ली : मध्यप्रदेशच्या धार येथील ऐतिहासिक

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ला; लष्कर-ए-तोयबा प्रमुख हाफिज सईदविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

जम्मू : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या सुरू असलेल्या तपासाच्या संदर्भात, एका विशेष एनआयए न्यायालयाने

Hormuz Strait Attack : होर्मुझ हल्ल्यात भारतीय नाविकाच्या मृत्यूनंतर भारताने इराणी दूतावासाला बजावले समन्स

नवी दिल्ली : इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीत संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) तेलवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्यात

Lalu Prasad Yadav : चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांचा जामीन कायम, सीबीआयची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने यांना मोठा दिलासा दिला आहे. चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानंतर लालू प्रसाद

Dhar Bhojshala supreme court : धार भोजशाळा वाद : 'प्रकरण अत्यंत संवेदनशील', अंतिम निकाल येईपर्यंत नमाजसाठी पर्यायी जागेची व्यवस्था - सर्वोच्च न्यायालय

मध्य प्रदेशातील धार येथील वादग्रस्त भोजशाळा परिसराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण अंतरिम