Jharkhand: चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले हेमंत सोरेन, INDIA आघाडीचे नेते उपस्थित

रांची: झारखंड(Jharkhand) मुक्‍ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन(Hemant Soren) यांनी आज गुरूवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्‍यपाल संतोष कुमार गंगवार यांनी झारखंडचे चौदावे मुख्‍यमंत्री म्‍हणून सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. झारखंडच्या इतिहासात चौथ्‍यांदा मुख्‍यमंत्रीपदाची शपथ घेणारे ते पहिले राजकीय नेते ठरले आहेत.


रांची शहरातील मारोबाडी मैदानावर आयोजित या शपथविधी सोहळ्याला झारखंड मुक्‍ती मोर्चाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष शिबू सोरेन, त्‍यांची पत्‍नी रुपी सोरेन, काँसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आरजेडीचे तेजस्वी यादव, काँग्रेस नेते तारिक अन्वर, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन, अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान प्रामुख्याने उपस्थित होते.


शपथविधी सोहळ्यासाठी रांची शहरात विशेष सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थाही बदल करण्‍यात आला होता. नुकत्‍याच झालेल्‍या झारखंड विधानसभा निवडणुकीत सोरेन यांच्‍या नेतृत्त्‍वाखालील झारखंड मुक्‍ती मोर्चाखालील आघाडीला ८१ पैकी ५६ जागा मिळाल्‍या. तर 'एनडीए' आघाडीला फक्त २४ जागांवर समाधान मानावे लागले.झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री होणार आहेत. राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले शिबू सोरेन यांचे ते पुत्र आहेत.

Comments
Add Comment

टाटा–एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेसला भीषण आग, २० हून अधिक प्रवासी जखमी, १ मृत्यू

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री भीषण रेल्वे अपघात घडला.

चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पासाठी निविदा िनघणार

पाकिस्तानचे पाणी थांबणार नवी दिल्ली : भारताने जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चिनाब नदीवर २६० मेगावॅट

राहुल बाबा, इतक्यात थकू नका; अजून बरेच पराभव पाहायचे आहेत

गृहमंत्री अमित शहा यांचा टोला अहमदाबाद : "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार होणाऱ्या पराभवामुळे आताच थकून

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी घेतला वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवार २८ डिसेंबर २०२५ रोजी १२९ व्या 'मन की बात'

स्मशानभूमीत जळत्या चितेशेजारी मुलांचा अभ्यास

अनोख्या शाळेची देशभरात चर्चा बिहार : सर्वसाधारणपणे शाळा म्हटलं की वर्ग येतात, कॅन्टीन असतं, मुलांना खेळायला