Jharkhand: चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले हेमंत सोरेन, INDIA आघाडीचे नेते उपस्थित

रांची: झारखंड(Jharkhand) मुक्‍ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन(Hemant Soren) यांनी आज गुरूवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्‍यपाल संतोष कुमार गंगवार यांनी झारखंडचे चौदावे मुख्‍यमंत्री म्‍हणून सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. झारखंडच्या इतिहासात चौथ्‍यांदा मुख्‍यमंत्रीपदाची शपथ घेणारे ते पहिले राजकीय नेते ठरले आहेत.


रांची शहरातील मारोबाडी मैदानावर आयोजित या शपथविधी सोहळ्याला झारखंड मुक्‍ती मोर्चाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष शिबू सोरेन, त्‍यांची पत्‍नी रुपी सोरेन, काँसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आरजेडीचे तेजस्वी यादव, काँग्रेस नेते तारिक अन्वर, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन, अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान प्रामुख्याने उपस्थित होते.


शपथविधी सोहळ्यासाठी रांची शहरात विशेष सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थाही बदल करण्‍यात आला होता. नुकत्‍याच झालेल्‍या झारखंड विधानसभा निवडणुकीत सोरेन यांच्‍या नेतृत्त्‍वाखालील झारखंड मुक्‍ती मोर्चाखालील आघाडीला ८१ पैकी ५६ जागा मिळाल्‍या. तर 'एनडीए' आघाडीला फक्त २४ जागांवर समाधान मानावे लागले.झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री होणार आहेत. राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले शिबू सोरेन यांचे ते पुत्र आहेत.

Comments
Add Comment

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी घेतला वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवार २८ डिसेंबर २०२५ रोजी १२९ व्या 'मन की बात'

स्मशानभूमीत जळत्या चितेशेजारी मुलांचा अभ्यास

अनोख्या शाळेची देशभरात चर्चा बिहार : सर्वसाधारणपणे शाळा म्हटलं की वर्ग येतात, कॅन्टीन असतं, मुलांना खेळायला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून भाजप, आरएसएसचे कौतुक!

जुना फोटो शेअर करत म्हणाले, ‘हीच संघटनेची शक्ती…’ नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार

देशात मल्टी-डोअर न्यायालये असावीत, विवादांची सुनावणी नको, ते सोडवावेत

गोव्यात 'मध्यस्थी' विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न पणजी : मध्यस्थता कायद्याच्या दुर्बळतेचे लक्षण नाही, तर तो

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल; आधार लिंक अनिवार्य

सणासुदीच्या काळात दलालांच्या गैरप्रकारांना आळा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची कन्फर्म तिकिटे मिळवणे म्हणजे जणू