ठाण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका, संचालिकेला अटक

  229

मुंबई: ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी जबरदस्ती चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा(sex racket) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी देह-व्यापाऱ्याच्या दलदलीत अडकलेल्या दोन महिलांची सुटका केल्याचा दावा केला आहे. सोबतच हे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेची चौकशी सुरू आहे.


ठाणे पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली. सेक्स रॅकेट चालवणाऱ्या ३० वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन महिलांना वाचवण्यात आले.या दोन्ही महिलांना जबरदस्ती वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते.


अधिकाऱ्यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या टीमने गुप्त सूचना मिळाल्यानंतर कारवाई करताना अंबरनाथ रेल्वे स्टेशनजवळ हॉटेलजवळ या आरोपी महिलेला पकडण्यासाठी सापळा रचला होता. ही महिला सेक्स रॅकेट चालवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत होती.


या सेक्स रॅकेटमध्ये २५ आणि २६ वर्षीय महिलांना जबरदस्ती ओढण्यात आले होते. या महिलांची सुटका करून त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच तिची चौकशी केली जात आहे. यामुळे या रॅकेटमध्ये इतर सामील आरोपींचा शोध घेतला जाईल.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या