ठाण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका, संचालिकेला अटक

  218

मुंबई: ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी जबरदस्ती चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा(sex racket) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी देह-व्यापाऱ्याच्या दलदलीत अडकलेल्या दोन महिलांची सुटका केल्याचा दावा केला आहे. सोबतच हे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेची चौकशी सुरू आहे.


ठाणे पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली. सेक्स रॅकेट चालवणाऱ्या ३० वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन महिलांना वाचवण्यात आले.या दोन्ही महिलांना जबरदस्ती वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते.


अधिकाऱ्यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या टीमने गुप्त सूचना मिळाल्यानंतर कारवाई करताना अंबरनाथ रेल्वे स्टेशनजवळ हॉटेलजवळ या आरोपी महिलेला पकडण्यासाठी सापळा रचला होता. ही महिला सेक्स रॅकेट चालवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत होती.


या सेक्स रॅकेटमध्ये २५ आणि २६ वर्षीय महिलांना जबरदस्ती ओढण्यात आले होते. या महिलांची सुटका करून त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच तिची चौकशी केली जात आहे. यामुळे या रॅकेटमध्ये इतर सामील आरोपींचा शोध घेतला जाईल.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली