Chandrashekhar Bawankule : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर चंद्रशेखर बावनकुळे खूश!

मुंबई : आमचे विरोधक एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज आहेत असे म्हणत होते. पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे (Mahayuti) नेते म्हणून अत्यंत स्पष्टपणे विरोधकांना आणि महाराष्ट्रातील जनतेला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे निर्णय घेतील तो निणर्य मान्य असेल अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. त्यासाठी त्यांचे आभार, असे पत्रकार परिषदेमध्ये चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले. तसेच सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाचे केंद्रीय नेतृत्व एकनाथ शिंदे, अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी चर्चा करेल, असेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.


https://www.youtube.com/live/sdYJmq_PS8Q?si=rgNnNAT69IB2o7am

पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी काम केले आहे. महायुतीचा चेहरा म्हणून त्यांनी राज्यात अनेक योजना राबवल्या. तसेच फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून सरकार चालवले. आज त्यांनी जी भूमिका घेतली आहे. मी त्याचे स्वागत करतो. त्यांची भूमिका राज्याला पुढे नेण्याची भूमिका आहे. तसेच त्यांचा निर्णय महायुतीला भक्कम करणारा आहे, असे देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.


आमची लढाई मुख्यमंत्री पदासाठी नाही तर आमची लढाई राज्यातील १४ कोटी जनतेसाठी होती. त्यामुळे जनतेने आम्हाला प्रचंड बहुमत दिले. पण महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदासाठी लढाई करत होती. त्याच्यात ८ मुख्यमंत्री होते. काँग्रेस आणि शरद पवार यांच्याकडे प्रत्येकी ३ आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे दोन मुख्यमंत्री होते, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला. तर उद्धव ठाकरे यांनी भाजपाला धोका दिला होता, अशी टीका देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना केली.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,