Chandrashekhar Bawankule : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर चंद्रशेखर बावनकुळे खूश!

मुंबई : आमचे विरोधक एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज आहेत असे म्हणत होते. पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे (Mahayuti) नेते म्हणून अत्यंत स्पष्टपणे विरोधकांना आणि महाराष्ट्रातील जनतेला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे निर्णय घेतील तो निणर्य मान्य असेल अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. त्यासाठी त्यांचे आभार, असे पत्रकार परिषदेमध्ये चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले. तसेच सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाचे केंद्रीय नेतृत्व एकनाथ शिंदे, अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी चर्चा करेल, असेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.


https://www.youtube.com/live/sdYJmq_PS8Q?si=rgNnNAT69IB2o7am

पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी काम केले आहे. महायुतीचा चेहरा म्हणून त्यांनी राज्यात अनेक योजना राबवल्या. तसेच फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून सरकार चालवले. आज त्यांनी जी भूमिका घेतली आहे. मी त्याचे स्वागत करतो. त्यांची भूमिका राज्याला पुढे नेण्याची भूमिका आहे. तसेच त्यांचा निर्णय महायुतीला भक्कम करणारा आहे, असे देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.


आमची लढाई मुख्यमंत्री पदासाठी नाही तर आमची लढाई राज्यातील १४ कोटी जनतेसाठी होती. त्यामुळे जनतेने आम्हाला प्रचंड बहुमत दिले. पण महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदासाठी लढाई करत होती. त्याच्यात ८ मुख्यमंत्री होते. काँग्रेस आणि शरद पवार यांच्याकडे प्रत्येकी ३ आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे दोन मुख्यमंत्री होते, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला. तर उद्धव ठाकरे यांनी भाजपाला धोका दिला होता, अशी टीका देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना केली.

Comments
Add Comment

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी