Chandrashekhar Bawankule : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर चंद्रशेखर बावनकुळे खूश!

  82

मुंबई : आमचे विरोधक एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज आहेत असे म्हणत होते. पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे (Mahayuti) नेते म्हणून अत्यंत स्पष्टपणे विरोधकांना आणि महाराष्ट्रातील जनतेला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे निर्णय घेतील तो निणर्य मान्य असेल अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. त्यासाठी त्यांचे आभार, असे पत्रकार परिषदेमध्ये चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले. तसेच सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाचे केंद्रीय नेतृत्व एकनाथ शिंदे, अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी चर्चा करेल, असेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.


https://www.youtube.com/live/sdYJmq_PS8Q?si=rgNnNAT69IB2o7am

पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी काम केले आहे. महायुतीचा चेहरा म्हणून त्यांनी राज्यात अनेक योजना राबवल्या. तसेच फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून सरकार चालवले. आज त्यांनी जी भूमिका घेतली आहे. मी त्याचे स्वागत करतो. त्यांची भूमिका राज्याला पुढे नेण्याची भूमिका आहे. तसेच त्यांचा निर्णय महायुतीला भक्कम करणारा आहे, असे देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.


आमची लढाई मुख्यमंत्री पदासाठी नाही तर आमची लढाई राज्यातील १४ कोटी जनतेसाठी होती. त्यामुळे जनतेने आम्हाला प्रचंड बहुमत दिले. पण महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदासाठी लढाई करत होती. त्याच्यात ८ मुख्यमंत्री होते. काँग्रेस आणि शरद पवार यांच्याकडे प्रत्येकी ३ आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे दोन मुख्यमंत्री होते, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला. तर उद्धव ठाकरे यांनी भाजपाला धोका दिला होता, अशी टीका देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना केली.

Comments
Add Comment

नागपूर - पुणे वंदे भारत या दिवसापासून धावणार

नागपूर : नागपूर (अजनी) ते पुणे आणि पुणे ते नागपूर (अजनी) अशी वंदे भारत एक्सप्रेस रविवार १० ऑगस्ट २०२५ पासून धावणार

एसटी महामंडळाच्या राखी पौर्णिमेसाठी ४० जादा गाड्या कार्यरत

लाडक्या बहिणींसाठी ८, ९ आणि ११ ऑगस्ट रोजी बसची विशेष सेवा पेण(स्वप्नील पाटील) : आधीच लाडक्या बहिणींना एसटी

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

नियमितपणे आढावा, समन्वय साधणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई : राज्यातील पाच

माधुरी लवकरच कोल्हापूरला परतणार!

कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश; माधुरीला परत पाठवण्याबाबत वनताराकडून आश्वासन कोल्हापूर: कोल्हापूरकरांच्या

उत्तराखंडमधील ढगफुटीत अडकले महाराष्ट्रातील ५१ पर्यटक

सर्व पर्यटक सुखरूप असल्याची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती मुंबई : उत्तराखंडमधील राज्यातील उत्तरकाशी

Hingoli Train Fire : हिंगोली रेल्वे स्थानकावर उभ्या बोगीला भीषण आग; संपूर्ण बोगी जळून खाक

हिंगोली : हिंगोली शहरातील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका जुन्या बोगीला बुधवारी (६ ऑगस्ट) सकाळी सुमारे ८:३०