President Murmu : भारतीय राज्यघटना तीन वर्षाच्या विचारमंथनाचे फलित : राष्ट्रपती मुर्मू

नवी दिल्ली : भारतीय संविधान लोकशाहीचा मजबूत पाया आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Murmu) यांनी मंगळवारी केले. संविधान दिनानिमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहांना संयुक्तपणे संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय संविधानाबद्दल आदर व्यक्त करुन संविधानाचे महत्व अधोरेखित केले. संविधान सदनाच्या (जुने संसद भवन) सेंट्रल हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभा सभापती जगदीप धनखड, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे मंचावर उपस्थित होते.



राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, पंच्याहत्तर वर्षांपूर्वी याच दिवशी ‘संविधान सदन’च्या याच सेंट्रल हॉलमध्ये संविधान सभेने राज्यघटना तयार करण्याचे कार्य पार पाडले. स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सर्व नागरिकांनी 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा केला. पुढील वर्षी २६ जानेवारीला आपण आपल्या प्रजासत्ताकाचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करू. अशा उत्सवांमुळे एकात्मता मजबूत होते.


भारतीय राज्यघटना ही काही महान विचारवंतांनी केलेल्या सुमारे तीन वर्षांच्या विचारमंथनाचे फलित आहे. तसेच खऱ्या अर्थाने ते आपल्या प्रदीर्घ स्वातंत्र्यलढ्याचे फलित आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यपालिका, विधिमंडळ आणि न्यायपालिका तसेच सर्व नागरिकांच्या सक्रिय सहभागातून आपल्या घटनात्मक आदर्शांना बळ मिळते, असे राष्ट्रपती म्हणाल्या. राज्यघटना हा जिवंत आणि प्रगतीशील दस्तावेज आहे.

Comments
Add Comment

Indian Mango : नेपाळने भारतीय आंब्यावर बंदी घातली? केंद्र सरकारचा मोठा खुलासा; अफवांवर विश्वास ठेवू नका

नेपाळने भारतीय आंब्याच्या (Indian Mango) आयातीवर बंदी घातल्याची किंवा आयात स्थगित केल्याची चर्चा काही माध्यमांमध्ये

India Breaks Silence On Gulf Conflict : भारताकडून आखाती प्रदेशात जहाजांवरील हल्ल्यांचा निषेध, हल्ले तात्काळ थांबवण्याचे आवाहन

नवी दिल्ली : मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. दरम्यान, आखाती प्रदेशात भारतीय खलाशांना घेऊन जाणाऱ्या

INDIAN RAILWAY : प्रवासी सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य; भारतीय रेल्वेकडून देशव्यापी अग्निसुरक्षा ऑडिटला सुरुवात

Navi Delhi : प्रवाशांची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी भारतीय रेल्वेने आता एका महत्त्वपूर्ण मोहिमेचे हाती घेतले आहे.

Guru Randhawa : धक्कादायक! गुरू रंधावाच्या जिमबाहेर गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा दावा; दिल्ली पोलिसांचा तपास सुरू

नवी दिल्ली : पंजाबी आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक  गुरु रंधावा (Guru Randhawa) यांच्या जिमबाहेर गोळीबार झाल्याची घटना

Central Government : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी पूर्ण माफ

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता आणि कच्च्या तेलाच्या (crude oil) वाढत्या

Indian Navy : नौदलाला मिळणार प्रगत जीएनएसएस जॅमर, संरक्षण मंत्रालयाकडून ४४९ कोटी रुपयांचा करार

नवी दिल्ली : भारतीय नौदलासाठी २० 'एन्हान्सड कॅपेबिलिटी ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम' जॅमर्स खरेदी