नवी दिल्ली : भारत आपल्या संरक्षण क्षमतेत सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करत आहे. ब्रह्मोस आणि अग्नी मालिकेतील क्षेपणास्त्रांनंतर आता अग्नी-5 Mk2 च्या अपग्रेडेड आवृत्तीची चर्चा संरक्षण क्षेत्रात सुरू झाली आहे. या क्षेपणास्त्राच्या संरचनेत बदल करून त्याचे वजन २० टक्क्यांहून अधिक कमी करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे त्याची कार्यक्षमता आणि संभाव्य मारक क्षमता वाढू शकते. (Agni-5 Mk2)
अग्नी-5 Mk2 मध्ये नेमका काय बदल?
अहवालानुसार, अग्नी-5 Mk2 मध्ये जुन्या आणि तुलनेने जड स्टील केसिंगऐवजी अॅडव्हान्स्ड कंपोझिट मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. यामुळे क्षेपणास्त्राचे एकूण वजन कमी करण्यास मदत झाली आहे. तसेच अधिक कार्यक्षम सॉलिड-फ्युएल प्रोपेलंटच्या वापरामुळे क्षेपणास्त्राच्या कामगिरीत सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मूळ अग्नी-5 ची अधिकृत रेंज साधारण ५,००० ते ५,८०० किलोमीटर असल्याचे संरक्षण क्षेत्रातील माहितीत नमूद केले जाते. मात्र, वजन कमी झाल्यामुळे अपग्रेडेड आवृत्तीची संभाव्य रेंज यापेक्षा अधिक असू शकते, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. (Agni-5 Mk2)
नवी दिल्ली: न्यायाधीशांच्या अधिकृत निवासस्थानी जळित नोटांची बंडले सापडल्याप्रकरणी वादात सापडलेले माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील सर्व ...
नवी दिल्ली: न्यायाधीशांच्या अधिकृत निवासस्थानी जळित नोटांची बंडले सापडल्याप्रकरणी वादात सापडलेले माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील सर्व ...
नवी दिल्ली: न्यायाधीशांच्या अधिकृत निवासस्थानी जळित नोटांची बंडले सापडल्याप्रकरणी वादात सापडलेले माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील सर्व ...