Nagpur: नागपूर मध्ये शालेय सहल घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात;अपघातात एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

  142

नागपूर: नागपुरात विद्यार्थांना सहलीला घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना आज, मंगळवारी सकाळी 9 वाजता घडली. नागपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील पेंढरी गावाजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त बसमध्ये नागपूर इथल्या सरस्वती शाळेतील विद्यार्थी होते. या दुर्घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.



यासंदर्भातील माहितीनुसार नागपुरातील शंकरनगर परिसरातील सरस्वती शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल आज, मंगळवारी वर्धा जिल्ह्यातील बोरधरण इथे जात होती. एकूण 5 बसेस शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेऊन चालल्या होत्या. त्यापैकी 4 बस सुखरूप पुढे गेल्या परंतु, शेवटी असलेल्या बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून पेंढरी गावाजवळ हा अपघात झाला. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ मिहान परिसरातील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच हिंगणा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे.
Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक