Nagpur: नागपूर मध्ये शालेय सहल घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात;अपघातात एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

  157

नागपूर: नागपुरात विद्यार्थांना सहलीला घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना आज, मंगळवारी सकाळी 9 वाजता घडली. नागपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील पेंढरी गावाजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त बसमध्ये नागपूर इथल्या सरस्वती शाळेतील विद्यार्थी होते. या दुर्घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.



यासंदर्भातील माहितीनुसार नागपुरातील शंकरनगर परिसरातील सरस्वती शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल आज, मंगळवारी वर्धा जिल्ह्यातील बोरधरण इथे जात होती. एकूण 5 बसेस शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेऊन चालल्या होत्या. त्यापैकी 4 बस सुखरूप पुढे गेल्या परंतु, शेवटी असलेल्या बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून पेंढरी गावाजवळ हा अपघात झाला. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ मिहान परिसरातील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच हिंगणा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे.
Comments
Add Comment

Sambhajinagar Illegal Construction: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध बांधकामावर हातोडा; विरोध करणाऱ्यावर होणार कायदेशीर कारवाई

विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश  संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दोन दिवसांच्या

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता