Kantara Team Accident : भीषण अपघात! 'कांतारा' सिनेमाच्या टीमची बस पलटली

अनेक कलाकार जखमी; सिनेमाचे शूटींगही थांबले


बंगळूर : मनोरंजन क्षेत्रातून (Entertainment News) मोठी बातमी समोर आली आहे. ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यांच्या कांतारा चॅप्टर १' (Kantara Chapter 1) चित्रपटाबाबत मोठी घटना घडली आहे. कंतारा चित्रपटातील संपूर्ण टीमचा भीषण अपघात (Kantara Team Accident) झाला आहे. यामध्ये अनेक कलाकार जखमी झाले असून काहींची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे चित्रपटाचे शुटींग देखील थांबवण्यात आले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात 'कांतारा चॅप्टर १'चे शुटींग सुरु होते. रविवारी रात्रीच्या सुमारास शूटींगच्या सेटवरुन परतणाऱ्या कलाकारांची मिनी बस पलटल्यामुळे भीषण अपघात झाला. या मिनी बसमध्ये २० कलाकार होते. या घटनेनंतर जखमींना जडकल आणि कुंदापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून कोल्लूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


दरम्यान, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मात्र झालेल्या या अपघातामुळे चित्रपटाच्या शुटींगवर काहीसा परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा

भारत धमक्यांना घाबरत नाही, घरात घुसून मारतो - पंतप्रधान मोदी

भोपाळ : “हा नवा भारत आहे, तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो,” असे