Raj Thackeray MNS : राज ठाकरेंचं इंजिन चिन्ह धोक्यात; मनसे पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता!

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निकालात (Assembly Election 2024) महायुती (Mahayuti) सरकार बहुमताने विजयी झाले आहे. परंतु दुसरीकडे राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेला (MNS) मोठा फटका बसला आहे. मनसे पक्षाकडून १२८ जागांवर उमेदवार निवडणूक लढवत होते. मात्र एकही आमदार विजयी होऊ न शकल्यामुळे राज ठाकरे यांना मोठा धक्का सहन करावा लागत आहे. अशातच मनसे पक्षाची मान्यता आता रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



मनसेचा पक्ष धोक्यात का?


निवडणूक आयोगाच्या (Election Commision) निकषानुसार, एखाद्या पक्षाला मान्यता टिकवायची असल्यास त्या पक्षाला एकूण ८ टक्के मतदान आणि १ जागा किंवा २ जागा आणि ६ टक्के मतदान किंवा ३ जागा आणि ३ टक्के मतदान यापैकी एक निकष त्या पक्षानं पूर्ण करणं आवश्यक आहे. मात्र मनसेला एकही जागा मिळाली नसून ४८ लाख मते देखील मिळाली नाहीत, त्यामुळे मनसे पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते, असे विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी सांगितले.



मान्यता रद्द झाल्यास काय परिणाम होणार?


मान्यता रद्द होणे म्हणजे पक्षाचे चिन्ह धोक्यात येणे. म्हणजेच राज ठाकरेंच इंजिन चिन्ह धोक्यात येऊ शकतं यापुढे त्यांना ते चिन्ह मिळू शकणार नाही. पुढील निवडणूक लढवण्यास राज ठाकरे यांना दुसरे चिन्ह घ्यावे लागेल.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा कांस्य पुतळा

नवी मुंबई विमानतळ : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

Vladimir Putin : भारतावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही, पुतिन यांचा मोदींवर विश्वास

मॉस्को : ‘भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य आणि व्यापारी भागीदारी अत्यंत मजबूत आहे. कोणत्याही देशाने दिलेल्या

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष

BCCI SQUAD SELECTION : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची बैठक सुरू; श्रेयस अय्यरकडे सोपवली जाणार धुरा?

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वरिष्ठ निवड समिती आज मुंबईतील मुख्यालयात महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत