नववर्षाच्या सुरुवातीला लागू होणार TRAIचे 'हे' नवे नियम!

पाहा कोणाला होणार फायदा?


मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून (TRAI) सातत्याने नवे अपडेट्स जारी होत असतात. अशातच आता पुन्हा टीआरएआयचे नवे नियम (TRAI New Rule) लागू होणार आहेत. देशभरातील दूरसंचार सेवांच्या सुधारणा करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने नवीन दूरसंचार नियम लागू करण्याचे आदेश दिले आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, सध्या वेगवेगळ्या राज्यामध्ये परवानगीसाठी वेगवेगळे नियम आणि शुल्क आहेत, ज्यामुळे कंपन्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र आता मोबाईल नेटवर्कसाठी लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी 'राईट ऑफ वे' (RoW) हा नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. यामुळे देशभरातील सर्व दूरसंचार कंपन्यांना एकसमान शुल्क आकारण्यात येणार आहे.


दरम्यान, हे नियम जिओ (JIO), एअरटेल (Airtel), बीएसएनएल (BSNL) आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) या कंपन्यांसाठी लागू होणार असून नववर्षापासून टीआरएआयची नवी नियमावली जारी होणार आहे.



काय फायदा होणार?


ROW नियमानुसार, परवानगी मिळवण्याची प्रक्रिया डिजिटल पद्धतीने होणार आहे. यामुळे राज्य सरकारांकडून दिल्या जाणाऱ्या परवानग्यांमध्ये पारदर्शकता येणार असून प्रक्रिया जलद व सोपी होईल. तसेच 5G टॉवर्सच्या उभारणीला गती मिळणार आहे.



मोबाईल वापरकर्त्यांना काय लाभ होईल ?



  • वेगवान नेटवर्क : 5G सेवेचा विस्तार जलद होईल.

  • उत्तम कनेक्टिव्हिटीः  देशभरात नेटवर्कची गुणवत्ता सुधारेल.

  • पारदर्शक सेवाः  डिजिटल परवानगी प्रक्रियेमुळे ग्रहिकांना अखंड सेवा मिळेल. (TRAI New Rule)

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे