मुंबई : राज्य विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाला. यात आमचा झालेला पराभव स्वीकरत आहोत. मात्र, आमची अपेक्षा होती तसा निकाल लागला नाही, पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार(Sharad Pawar) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पवार म्हणाले की, आमची अपेक्षा होती तसा निकाल नाही लागला, पण हा लोकांचा निर्णय आहे. त्यांनी निकालाचे अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले आणि आम्ही पुन्हा जोमाने कामाला लागू. मी निवृत्त व्हावं की नाही, हे मी व माझे सहकारी ठरवतील. निवडणुकीपूर्वीही त्यांनी संसद सदस्यतेबाबत पुनर्विचार करण्याची शक्यता वर्तवली होती.
महिला मतदारांनी लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला पाठिंबा दिल्याचे पवारांनी मान्य केले. या योजनेत महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले, त्यामुळे महिलांमध्ये प्रभाव पडला.
पवारांनी यंदाच्या निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचे सांगितले. तसेच, ईव्हीएमविषयी अधिकृत माहिती घेतल्याशिवाय काही सांगणे अशक्य असल्याचे मत व्यक्त केले.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…