मी निवृत्त व्हावं की नाही, हे मी व माझे सहकारी ठरवतील - शरद पवार

मुंबई : राज्य विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाला. यात आमचा झालेला पराभव स्वीकरत आहोत. मात्र, आमची अपेक्षा होती तसा निकाल लागला नाही, पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार(Sharad Pawar) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.


पवार म्हणाले की, आमची अपेक्षा होती तसा निकाल नाही लागला, पण हा लोकांचा निर्णय आहे. त्यांनी निकालाचे अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले आणि आम्ही पुन्हा जोमाने कामाला लागू. मी निवृत्त व्हावं की नाही, हे मी व माझे सहकारी ठरवतील. निवडणुकीपूर्वीही त्यांनी संसद सदस्यतेबाबत पुनर्विचार करण्याची शक्यता वर्तवली होती.



लाडकी बहीण योजनेचा प्रभाव


महिला मतदारांनी लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला पाठिंबा दिल्याचे पवारांनी मान्य केले. या योजनेत महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले, त्यामुळे महिलांमध्ये प्रभाव पडला.


पवारांनी यंदाच्या निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचे सांगितले. तसेच, ईव्हीएमविषयी अधिकृत माहिती घेतल्याशिवाय काही सांगणे अशक्य असल्याचे मत व्यक्त केले.

Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल