Assembly election 2024: मविआला विरोधी पक्षनेते पदही नाही

  122

मुंबई: विधानसभा निवडणुकीत(Assembly election 2024) महायुतीचा अभूतपूर्व आणि निर्विवाद एकतर्फी विजय झाला. महायुतीला २३६ जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांची धुळधाण झाली. मविआला केवळ ४९ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. यामध्ये ठाकरे गटाला २०, काँग्रेसला १५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १० आणि मित्रपक्षाला चार जागाच जिंकता आल्या.


महाविकास आघाडीच्या या अपयशामुळे शरद पवार, संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांची पुढील राज्यसभेचा कार्यकाळ देखील मिळणार नाही. महाराष्ट्रातून राज्यसभेत जाण्यासाठी सामान्यपणे ४३ चा कोटा निर्धारित होतो. त्यानुसार महाविकास आघाडीत तेही एका नावावर सहमती झाल्यास केवळ एक राज्यसभा सदस्य निवडून आणता येईल असं समोर आलं आहे.


शरद पवारांच्या जागेवरही राष्ट्रवादीला राज्यसभेवर कुणाला पाठवता येणार नाही. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस या तीनही पक्षांना एकत्रित मिळून एकच खासदार निवडून देता येणार आहे. त्यामुळे यंदा विधानसभेत विरोधी पक्षनेता तर नसेलच, पण आता मविआचे (इंडी आघाडी) राज्यसभेतील संख्याबळही कमी होणार आहे.


राज्यात विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक २८+१ = २९ सदस्यांची संख्या सध्या कोणत्याच विरोधी पक्षाकडे नाही. सत्ता स्थापन करताना एकत्रित येऊन संख्याबळ सादर कराव लागतं. मात्र पक्षनेता निवडताना किमान एका पक्षाकडे २९ सदस्य असणं गरजेचं आहे. सध्या विरोधी पक्षातील कोणताच पक्ष अपेक्षित संख्याबळ गाठत नाही.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत