Assembly election 2024: मविआला विरोधी पक्षनेते पदही नाही

मुंबई: विधानसभा निवडणुकीत(Assembly election 2024) महायुतीचा अभूतपूर्व आणि निर्विवाद एकतर्फी विजय झाला. महायुतीला २३६ जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांची धुळधाण झाली. मविआला केवळ ४९ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. यामध्ये ठाकरे गटाला २०, काँग्रेसला १५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १० आणि मित्रपक्षाला चार जागाच जिंकता आल्या.


महाविकास आघाडीच्या या अपयशामुळे शरद पवार, संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांची पुढील राज्यसभेचा कार्यकाळ देखील मिळणार नाही. महाराष्ट्रातून राज्यसभेत जाण्यासाठी सामान्यपणे ४३ चा कोटा निर्धारित होतो. त्यानुसार महाविकास आघाडीत तेही एका नावावर सहमती झाल्यास केवळ एक राज्यसभा सदस्य निवडून आणता येईल असं समोर आलं आहे.


शरद पवारांच्या जागेवरही राष्ट्रवादीला राज्यसभेवर कुणाला पाठवता येणार नाही. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस या तीनही पक्षांना एकत्रित मिळून एकच खासदार निवडून देता येणार आहे. त्यामुळे यंदा विधानसभेत विरोधी पक्षनेता तर नसेलच, पण आता मविआचे (इंडी आघाडी) राज्यसभेतील संख्याबळही कमी होणार आहे.


राज्यात विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक २८+१ = २९ सदस्यांची संख्या सध्या कोणत्याच विरोधी पक्षाकडे नाही. सत्ता स्थापन करताना एकत्रित येऊन संख्याबळ सादर कराव लागतं. मात्र पक्षनेता निवडताना किमान एका पक्षाकडे २९ सदस्य असणं गरजेचं आहे. सध्या विरोधी पक्षातील कोणताच पक्ष अपेक्षित संख्याबळ गाठत नाही.

Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे