Assembly election result: निवडणुकीच्या जल्लोषादरम्यान लागली आग, नवनिर्वाचित आमदारांसह अनेक महिला जखमी

मुंबई: राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर करण्यात आले. निकाल घोषित केल्यानंतर राज्यातील चांदगड विधानसभा मतदार संघातून हैराणजनक बातमी समोर आली आहे. येथे अपक्ष उमेदवार म्हणून शिवाजी पाटील यांनी विजय मिळवला. रात्री शिवाजी पाटील यांच्या विजयाच्या जल्लोषादरम्यान अचानक मोठी आग लागली. यात पाटीलही जखमी झाले आहेत.


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या जल्लोषाच्या वेळेस काही महिलाही जखमी झाल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाजी पाटील यांच्या विजयानंतर काही महिला महंगावमध्ये त्यांना ओवाळत होत्या. यावेळेस क्रेनमधून मोठ्या प्रमाणात गुलाल आरतीच्या थाळीवर पडला. यामुळे आग लागली.



अचानक लागलेल्या आगीने महिलाही जखमी


यानंतर आग अचानक पसरली. यात शिवाजी पाटील यांच्यासह काही महिलाही जखम झाल्या. चांदगड विधानसभा मतदार संघातून शिवाजी पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि एनसीपी शरद पवार गटातील उमेदवार होते. मात्र दोन्ही पक्षांच्या उमेदवाराला मात देत त्यांनी २१ हजार १३४ मतांनी निवडणूक जिंकली. दुसऱ्या स्थानावर अजित पवार यांच्या एनसीपी पक्षाचे राजेश पाटील होते.


Comments
Add Comment

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

चंद्रपूर-यवतमाळ एसटीला अपघात

करंजी : करंजीजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि दहा जण गंभीर