विकासकामांना जनतेने पोचपावती दिल्याने महायुतीचा दणदणीत विजय

Share

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मानले आभार

मुंबई : विधानसभा निवडणूक निकालात महायुतीने जोरदार प्रदर्शन केले आहे. दोऩशे जागा महायुतीने जिंकल्या आहेत. त्यामुळे हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरू केला आहे. कुठे मिठाई वाटत, तर कुठे ढोल-ताशे वाजवत कार्यकर्ते आनंद साजरा करत आहेत. या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.

‘राज्यात लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय होत आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना ते म्हणाले, आम्ही केलेल्या विकासकामांची जनतेने पोचपावती दिली. या विजयामुळे पुढील काळात आमची जबाबदारी वाढणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या हेतुने ‘लाडकी बहीण योजने’ची घोषणा महायुती सरकारने केली होती. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा करण्याची तरतूद करण्यात आली होती. आतापर्यंत अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. या योजनेचा जोरदार प्रचार हा महायुतीतील पक्षांनी केला होता. सत्ता आल्यावर या योजनेच्या रक्कमेत वाढ करण्याचे आश्वासनही महायुती सरकारने दिले होते. आता याच योजनेचा फायदा विधानसभा निवडणुकीत झाल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले.

मतदारांपुढे महायुती नतमस्तक

विधानसभेत महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला आहे. आतापर्यंतच्या अनेक वर्षांचा निवडणुका आपण पाहिल्या, मात्र अशा पद्धतीने लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आपण पाहिली नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. लाडक्या बहिणी असेल, लाडके भाऊ असतील किंवा लाडके शेतकरी असतील या सर्वांनी महायुतीवर मनापासून प्रेम दाखवले आहे. त्या सर्वांचे आभार मानताना या ऐतिहासिक विषयासाठी सर्वांना दंडवत घातला पाहिजे, अशा शब्दात मतदारांचे आभार देखील शिंदे यांनी मानले.

जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – फडणवीस

महाराष्ट्राच्या जनतेसमोर महायुती नतमस्तक असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. महायुतीवर महाराष्ट्राने दाखवलेला हा विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला आता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात काम करावे लागणार असल्याची जाणीव होत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. म्हटले आहे. इतकेच नाही तर त्यांना मतदारांना आश्वस्त करतो की, जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला आम्ही तडा जाऊ देणार नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. आमची जबाबदारी वाढवणारा हा विजय असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Recent Posts

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

20 minutes ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

1 hour ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

1 hour ago

KKR vs GT, IPL 2025: गिल-बटलरची तुफानी खेळी, गुजरातने केकेआरसमोर ठेवले १९८ धावांचे आव्हान

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…

1 hour ago

IPL 2025: शुभमन गिल लग्न करतोय? आयपीएलमध्ये प्रश्न विचारल्यावर गिल लाजला आणि म्हणाला…

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…

3 hours ago