विकासकामांना जनतेने पोचपावती दिल्याने महायुतीचा दणदणीत विजय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मानले आभार


मुंबई : विधानसभा निवडणूक निकालात महायुतीने जोरदार प्रदर्शन केले आहे. दोऩशे जागा महायुतीने जिंकल्या आहेत. त्यामुळे हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरू केला आहे. कुठे मिठाई वाटत, तर कुठे ढोल-ताशे वाजवत कार्यकर्ते आनंद साजरा करत आहेत. या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.


‘राज्यात लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय होत आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना ते म्हणाले, आम्ही केलेल्या विकासकामांची जनतेने पोचपावती दिली. या विजयामुळे पुढील काळात आमची जबाबदारी वाढणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.



राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या हेतुने ‘लाडकी बहीण योजने’ची घोषणा महायुती सरकारने केली होती. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा करण्याची तरतूद करण्यात आली होती. आतापर्यंत अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. या योजनेचा जोरदार प्रचार हा महायुतीतील पक्षांनी केला होता. सत्ता आल्यावर या योजनेच्या रक्कमेत वाढ करण्याचे आश्वासनही महायुती सरकारने दिले होते. आता याच योजनेचा फायदा विधानसभा निवडणुकीत झाल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले.



मतदारांपुढे महायुती नतमस्तक


विधानसभेत महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला आहे. आतापर्यंतच्या अनेक वर्षांचा निवडणुका आपण पाहिल्या, मात्र अशा पद्धतीने लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आपण पाहिली नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. लाडक्या बहिणी असेल, लाडके भाऊ असतील किंवा लाडके शेतकरी असतील या सर्वांनी महायुतीवर मनापासून प्रेम दाखवले आहे. त्या सर्वांचे आभार मानताना या ऐतिहासिक विषयासाठी सर्वांना दंडवत घातला पाहिजे, अशा शब्दात मतदारांचे आभार देखील शिंदे यांनी मानले.



जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही - फडणवीस


महाराष्ट्राच्या जनतेसमोर महायुती नतमस्तक असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. महायुतीवर महाराष्ट्राने दाखवलेला हा विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला आता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात काम करावे लागणार असल्याची जाणीव होत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. म्हटले आहे. इतकेच नाही तर त्यांना मतदारांना आश्वस्त करतो की, जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला आम्ही तडा जाऊ देणार नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. आमची जबाबदारी वाढवणारा हा विजय असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

जनगणना २०२७: मुंबईत पूर्व चाचणी चेंबूर एम पश्चिम विभागात

मुंबई (खास प्रतिनिधी) : जनगणना - २०२७ च्या तयारीचा एक भाग म्हणून, पूर्वचाचणी घेतली जाणार आहे. ज्यामध्ये जनगणनेच्या

महाराष्ट्रातील ७ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: महाराष्ट्र शासनाने नुकतेच प्रशासकीय कामकाजात मोठे फेरबदल केले असून, सात वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)

नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका राहणार बंद? जाणून घ्या...

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात बँकांशी संबंधित कोणतेही काम करायचे असल्यास आधीच सावधान राहा, कारण नोव्हेंबरमध्ये

कबुतर खान्यांसाठी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली मुंबई महापालिका आयुक्तांची भेट, केली ही मागणी...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता

उद्धव ठाकरे हे स्वतःच 'अजगर'- बावनकुळेंचा जोरदार हल्ला, 'आयत्या बिळावर नागोबा' म्हणत शेलारांची टीका

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकारण अ‍ॅनाकोंडा, अजगर या शब्दांच्या टीकेवरून चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरेंनी