Jharkhand Election Result 2024: झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन! इंडिया आघाडीला ५० जागांवर आघाडी

  67

मुंबई: झारखंडमध्ये(Jharkhand Election Result 2024) पुन्हा एकदा हेमंत सोरेन सरकार बनताना दिसत आहे. मतमोजणीच्या आकड्यांनुसार झारखंड इंडिया आघाडी ५१ जागांवर आघाडीवर आहे. तर एनडीएला २८ जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. तर इतर २ जागांवर आघाडीवर आहे. यावेळेस पुन्हा झारखंडमध्ये जेएमएमचे सरकार बनत असेल तर असे पहिल्यांदाच होईल की झारखंडमध्ये एखाद्या सरकारने दुसऱ्यांदा सरकार बनवले.


निवडणूक आयोगानुसार झारखंड मुक्ती मोर्चा म्हणजेच जेएमएम ३० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप दुसऱ्या स्थानावर २६ जागांसह आहे. सर्वच जागांवर काँटे की टक्कर सुरू आहे. अशातच सर्वांच्या निवडणुका निकालावर आहेत. काही तासांतच हे स्पष्ट होईल की कोणता पक्ष झारखंडमध्ये सरकार बनवणार आहे. मात्र आतापर्यंतच्या आकड्यांवरून असे वाटत आहे की झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार बनत आहे.


झारखंडच्या ८१ जागांवर दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. पहिल्या टप्प्यातील मतदान १३ नोव्हेंबर आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान २० नोव्हेंबरला झाले होते. दोन्ही टप्प्यात ६६ टक्केपेक्षा अधिक मतदान झाले होते. यावेळेस ही निवडणूक इंडिया आघाडी आणि एनडीए यांच्यात आहे.


Comments
Add Comment

Floods in Punjab: पंजाबमध्ये पूरपरिस्थिती आणखीन बिकट, मृतांचा आकडा ४३ वर... १६५५ गावे प्रभावित

चंदीगड : पंजाब राज्यात पूरपरिस्थिती आणखीन बिकट झाली आहे. आणखीन सहा जणांना आपला जीव गमवावा लागला असल्यामुळे, 

जीएसटी सुसूत्रीकरणावर काँग्रेसने केलेल्या टीकेला पंतप्रधान मोदींचे चोख प्रत्युत्तर, काय म्हणाले पहा...

नवी दिल्ली: आज संपूर्ण देश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या जीएसटी सुसूत्रीकरणावर सकारात्मक चर्चा

डिजिटल भारत: देशात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या १०० कोटींच्या पुढे

नवी दिल्ली: भारताने डिजिटल जगात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या तब्बल

New GST Rates : दिवाळी धमाका ऑफर सरकारकडूनच! आता खर्च कमी, मजा जास्त; पनीर, दूध, औषधं आणि शालेय साहित्य जीएसटीमुक्त, ही संपूर्ण यादी वाचा

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दिवाळीच्या

"वचन पूर्ण केलं" GST कर रचनेच्या बदलावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली: वाढणाऱ्या महागाईचा फटका प्रत्येक देशवासीयांना बसत आहे. त्यात सणासुदीच्या काळांत वाढणारे कर

'या' अल्पसंख्यांकांना पासपोर्टशिवाय भारतात राहण्याची मुभा

नवी दिल्ली : पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांगलादेश येथून भारतात आलेल्या हिंदू, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन आणि पारशी