Jharkhand Election Result 2024: झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन! इंडिया आघाडीला ५० जागांवर आघाडी

मुंबई: झारखंडमध्ये(Jharkhand Election Result 2024) पुन्हा एकदा हेमंत सोरेन सरकार बनताना दिसत आहे. मतमोजणीच्या आकड्यांनुसार झारखंड इंडिया आघाडी ५१ जागांवर आघाडीवर आहे. तर एनडीएला २८ जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. तर इतर २ जागांवर आघाडीवर आहे. यावेळेस पुन्हा झारखंडमध्ये जेएमएमचे सरकार बनत असेल तर असे पहिल्यांदाच होईल की झारखंडमध्ये एखाद्या सरकारने दुसऱ्यांदा सरकार बनवले.


निवडणूक आयोगानुसार झारखंड मुक्ती मोर्चा म्हणजेच जेएमएम ३० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप दुसऱ्या स्थानावर २६ जागांसह आहे. सर्वच जागांवर काँटे की टक्कर सुरू आहे. अशातच सर्वांच्या निवडणुका निकालावर आहेत. काही तासांतच हे स्पष्ट होईल की कोणता पक्ष झारखंडमध्ये सरकार बनवणार आहे. मात्र आतापर्यंतच्या आकड्यांवरून असे वाटत आहे की झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार बनत आहे.


झारखंडच्या ८१ जागांवर दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. पहिल्या टप्प्यातील मतदान १३ नोव्हेंबर आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान २० नोव्हेंबरला झाले होते. दोन्ही टप्प्यात ६६ टक्केपेक्षा अधिक मतदान झाले होते. यावेळेस ही निवडणूक इंडिया आघाडी आणि एनडीए यांच्यात आहे.


Comments
Add Comment

भारताचे अस्त्र क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या विमानांचा वेध घेणार

नवी दिल्ली : डीआरडीओने अर्थात भारतीय संरक्षण संशोधन प्रबोधिनीने अस्त्र क्षेपणास्त्राची आधुनिक आवृत्ती विकसित

बिपिन जोशीची हमास दहशतवाद्यांकडून हत्या

युद्धात ठार झालेला एकमेव हिंदू इस्रायल-हमास युद्धात नेपाळचा तरुण विद्यार्थी बिपिन जोशीला हमासच्या

सुशांत सिंह राजपूतची बहीण बिहारमध्ये लढवणार निवडणूक

देशात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. बिहार विधानसभा निवडणूक २०२५ साठी अनेकांची नावं समोर येत आहेत.

पंतप्रधान मोदी आज बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचा करणार शुभारंभ

पाटणा: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्रचार मोहिमेचा

जैसलमेरमध्ये भीषण अपघात, बसला आग लागल्याने २० जणांचा मृत्यू

मुंबई : जैसलमेरहून जोधपूरकडे निघालेल्या एका खासगी बसला जैसलमेर-जोधपूर महामार्गावर थईयात

योगी सरकारची उत्तर प्रदेशातील १.८६ कोटी महिलांना 'ही' दिवाळी भेट!

लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील १.८६ कोटी माता-भगिनींना