महायुती-मविआ अलर्ट! गुप्त बैठका वाढल्या, हॉटेलही बूक झाले, पुढे काय?
मुंबई : विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) मतदान (Voting) पार पडले असून निकाल लागण्यास काही तास शिल्लक राहिले आहेत. मतदान सुरळीतपणे पार पडल्यानंतर मतमोजणीही सुरळीतपणे पार पडण्यासाठी निवडणूक आयोग (Election Commision) व महापालिकेने (Municipality) चोख नियोजन केले आहे. तसेच निकालाआधीच अनेक विभागाकडून एक्झिट पोल (Exit Poll) जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये काही विभागाने महायुती (Mahayuti) तर काही संस्थांनी मविआचं (Maha Vikas Aghadi) सरकार येईल असा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही गट अलर्ट मोडवर आले आहेत.
Maharashtra Assembly Election : नेत्यांचा विश्वास खरा ठरणार कि अतिआत्मविश्वास नडणार!
एक्झिट पोलनुसार दाखवल्या जाणाऱ्या मतदानाची टक्केवारी पाहता ऐनवेळी कसलीही बंडखोरी होऊ नये याची पुरेपुर काळजी दोन्ही आघाडीतील नेते मंडळींकडून केली जात आहे. निकालादरम्यान, दगाफटका होऊ नये यासाठी राजकीय पक्षांकडून खास विमाने आणि हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत.
काँग्रेसकडून विशेष विमानाची व्यवस्था
वाढत्या मतदारांनी टक्केवारी पाहता काँग्रेसकडून (Congress) विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच जर काठावरचं बहुमत मिळाल्यास सत्तास्थापनेसाठी प्लॅन बी तयार करण्यात येत आहे.
त्याचबरोबर निकालाच्या दुसऱ्याच दिवशी आमदारांना मुंबईत बोलावण्यात आले आहे. तसेच विजयी झालेले बंडखोर आणि अपक्ष आमदारांना मुंबईत आणण्यासाठी या मंडळींची राहण्याची व्यवस्था फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.
दरम्यान, भाजपाने (BJP) सॉफीटेल हॉटेल तर ठाकरे गटाने (UBT Group) ग्रँड हयात हॉटेलमधील खोल्या बुक केल्याची माहिती मिळाली आहे. अपक्ष आमदारांना आपल्याकडे घेण्यासाठी त्या त्या विभागातील मोठ्या नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच वरिष्ठ नेते मंडळींच्या एका मागोमाग एक बैठका सुरू झाल्या आहेत. त्यामुळे उद्या विधानसभा निकालाचे वातावरणात काय रंगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.