Life certificate: पेन्शनधारकांसाठी उरलेत फक्त ९ दिवस, आजच करा हे काम

मुंबई: केंद्र सरकारच्या पेन्शनर्ससाठी महत्त्वाची आहे. जर तुम्ही दरवर्षी जमा करावे लागणारे जीवन प्रमाणपत्र(Life certificate) अजूनपर्यंत सादर केले नसेल तर आणखी फक्त ९ दिवस बाकी राहिले आहेत. ३० नोव्हेंबर २०२४ च्या आधी तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर करा. नाहीतर तुम्हाला मिळणारी पेन्शन बंद होऊ शकते. तसेच त्याचे फायदेही बंद होतील.


८० वर्षांपेक्षा अधिक वयाचे पेन्शनधारक १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यत जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात तर दुसरे पेन्शनधारक १ नोव्हेंबर २०२४ ते ३० नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.



कधीपर्यंत जमा करण्याची मुदत


नोव्हेंबरचा महिना पेन्शनधारकांसाठी खूप महत्त्वाचा असतो. पेन्शन मिळवणाऱ्या पेन्शनधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असते. यामुळे त्यांना पेन्शन मिळणे कायम राहते. हे जीवन प्रमाणपत्र एका वर्षासाठी वैध असते. गेल्या वर्षी ज्यांनी जीवन प्रमाणपत्र सादर केले होते ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत वैध होते. अशातच डिसेंबर महिन्यापासून पेन्शन मिळवण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असते.


८० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांसाठी जीवन प्रमाणपत्र(Life certificate) सादर करण्याची सुविधा १ ऑक्टोबर पासून ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत आहे. तर ६० वर्षापेक्षा अधिक वयाचे वरिष्ठ नाpepepemगरिक १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.

Comments
Add Comment

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळात १७,७४२ पदांची होणार जंगी भरती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी)