Life certificate: पेन्शनधारकांसाठी उरलेत फक्त ९ दिवस, आजच करा हे काम

मुंबई: केंद्र सरकारच्या पेन्शनर्ससाठी महत्त्वाची आहे. जर तुम्ही दरवर्षी जमा करावे लागणारे जीवन प्रमाणपत्र(Life certificate) अजूनपर्यंत सादर केले नसेल तर आणखी फक्त ९ दिवस बाकी राहिले आहेत. ३० नोव्हेंबर २०२४ च्या आधी तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर करा. नाहीतर तुम्हाला मिळणारी पेन्शन बंद होऊ शकते. तसेच त्याचे फायदेही बंद होतील.


८० वर्षांपेक्षा अधिक वयाचे पेन्शनधारक १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यत जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात तर दुसरे पेन्शनधारक १ नोव्हेंबर २०२४ ते ३० नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.



कधीपर्यंत जमा करण्याची मुदत


नोव्हेंबरचा महिना पेन्शनधारकांसाठी खूप महत्त्वाचा असतो. पेन्शन मिळवणाऱ्या पेन्शनधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असते. यामुळे त्यांना पेन्शन मिळणे कायम राहते. हे जीवन प्रमाणपत्र एका वर्षासाठी वैध असते. गेल्या वर्षी ज्यांनी जीवन प्रमाणपत्र सादर केले होते ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत वैध होते. अशातच डिसेंबर महिन्यापासून पेन्शन मिळवण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असते.


८० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांसाठी जीवन प्रमाणपत्र(Life certificate) सादर करण्याची सुविधा १ ऑक्टोबर पासून ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत आहे. तर ६० वर्षापेक्षा अधिक वयाचे वरिष्ठ नाpepepemगरिक १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.

Comments
Add Comment

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता

उद्धव ठाकरे हे स्वतःच 'अजगर'- बावनकुळेंचा जोरदार हल्ला, 'आयत्या बिळावर नागोबा' म्हणत शेलारांची टीका

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकारण अ‍ॅनाकोंडा, अजगर या शब्दांच्या टीकेवरून चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरेंनी

मुंबईच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांना मोठा दिलासा, रेल्वेकडून पर्यायी पादचारी पूल झाला खुला

मुंबई : शीव रेल्वे उड्डाणपुलाचे काम आता लवकरच सुरु होणार असून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने एक

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना ११ हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण : मुख्यमंत्री

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात

आदित्य ठाकरेंनी 'महाराष्ट्राचा पप्पू' बनू नये!

मतदार याद्यांच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार; राहुल गांधींसारखे 'खोदा पहाड, चुहा भी नही निकला' मुंबई: शिवसेना

मुंबईकरांच्या सेवेत १५० नवीन इलेक्ट्रिक बेस्ट बस सज्ज!२१ मार्गावर दररोज १.९ लाख प्रवाशांना लाभ

मुंबई: मुंबईतील परिवहन सेवा आधुनिक आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दिशेने आज एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. राज्य