CNG : निकालाआधीच सीएनजी गॅस दोन रुपयांनी महागला

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर आणि निकालाआधी महाराष्ट्रात सीएनजी गॅसच्या दरात दोन रुपयांनी वाढ (CNG Price Hike) करण्यात आली आहे. महानगर गॅस कंपनीने याबाबतचा निर्णय घेतला आहे. आजपासून नवे दर लागू होणार आहेत.


मुंबईसह महानगरचे गॅस ज्या ज्या भागांमध्ये वापरले जातात तिथे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरवाढीनंतर गॅस आता ७७ रुपये प्रति किलोग्रॅम मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, इनपुट कॉस्ट वाढवल्याने एमजीएलने दरात वाढ केली आहे. नैसर्गिक वायूच्या खरेदीत वाढ आणि इतर ऑपरेटिंग खर्चात वाढ झाल्याने कंपनीने गॅसचे दर वाढवले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील बाजार स्थिर नाही. शिवाय तेलाच्या किंमतीतही सतत बदल होत आहेत. त्याचे परिणाम देखील जगभरात दिसून येत आहेत.


कंपनीने याआधी जुलै महिन्यात सीएनजीची किंमत वाढवली ((CNG Price Hike)) होती. सीएनजीच्या दरात किलोमागे १.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सीएनजीची किंमत ७५ रुपये किलो होती. आता २ रुपयांनी दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे.

Comments
Add Comment

कोकणासाठी सोनेरी दिवस; महाराष्ट्र सरकार उभारणार वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग

मंत्री नितेश राणेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण

Game Changer Decision.... वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाला हिरवा कंदील, कोकणच्या विकासाची दारं उघडणार!'

आंबा, काजू, मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार; तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध होईल – मंत्री नितेश राणे नागपूर:

Breaking News ! पालिका निवडणुकीसाठी युतीचा फॉर्म्युला ठरणार? भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज रात्री ९ वाजता महत्त्वपूर्ण बैठक

नागपूर : राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या

मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी आता लोकायुक्तांच्या चौकशीकक्षेत

महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक २०२५ विधानसभेत मंजूर नागपूर : महाराष्ट्रातील भ्रष्टाचार विरोधी यंत्रणेला

पुणे आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनींना वारंवार करावी लागते 'प्रेग्नन्सी टेस्ट'; आमदारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न

नागपूर : पुणे जिल्ह्यातील आदिवासी शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थिनींना सुट्टीवरून परतल्यानंतर वारंवार

मुंबईकरांसाठी मोठी भेट, ओसी नसलेल्या २० हजार इमारतींना मिळणार दिलासा

दहा लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना फायदा सुधारीत भोगवटा अभय योजनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून