CNG : निकालाआधीच सीएनजी गॅस दोन रुपयांनी महागला

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर आणि निकालाआधी महाराष्ट्रात सीएनजी गॅसच्या दरात दोन रुपयांनी वाढ (CNG Price Hike) करण्यात आली आहे. महानगर गॅस कंपनीने याबाबतचा निर्णय घेतला आहे. आजपासून नवे दर लागू होणार आहेत.


मुंबईसह महानगरचे गॅस ज्या ज्या भागांमध्ये वापरले जातात तिथे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरवाढीनंतर गॅस आता ७७ रुपये प्रति किलोग्रॅम मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, इनपुट कॉस्ट वाढवल्याने एमजीएलने दरात वाढ केली आहे. नैसर्गिक वायूच्या खरेदीत वाढ आणि इतर ऑपरेटिंग खर्चात वाढ झाल्याने कंपनीने गॅसचे दर वाढवले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील बाजार स्थिर नाही. शिवाय तेलाच्या किंमतीतही सतत बदल होत आहेत. त्याचे परिणाम देखील जगभरात दिसून येत आहेत.


कंपनीने याआधी जुलै महिन्यात सीएनजीची किंमत वाढवली ((CNG Price Hike)) होती. सीएनजीच्या दरात किलोमागे १.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सीएनजीची किंमत ७५ रुपये किलो होती. आता २ रुपयांनी दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे.

Comments
Add Comment

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे