Encounter : छत्तीसगड चकमकीत १० नक्षलवाद्यांचा खात्मा

रायपूर : छत्तीसगडच्या सुकमा येथे आज, शुक्रवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्‍या चकमकीत (Encounter) १० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यावेळी सुरक्षा दलाने त्यांच्याकडून एके-४७ रायफलींसह मोठ्या प्रमाणात शस्‍त्रास्‍त्रे जप्त केली आहेत.


यासंदर्भातील माहितीनुसार छत्तीसगडच्या भांडारपदरच्या जंगलात सुरक्षा दलाचे जवान नक्षलवाद्यांची शोधमोहिम राबवत असताना अचानक चकमक सुरू झाली. यामध्ये १० नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे.


चकमकीनंतर शोध मोहिम राबवण्यात आली. यात आतापर्यंत १० जणांचे मृतदेह सापडले आहेत. या परिसरात छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील कोंटा आणी किस्टाराम एरिया कमेटीचे नक्सली सदस्य असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सुकमा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन भेज्जी क्षेत्राअंतर्गत्‍कोराजुगुड़ा, दंतेसपुरम, नागाराम, भंडारपदरच्या जंगल क्षेत्रात चकमक झडली. याबाबत बस्तचे पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी सांगितले की, दक्षिण सुकमामध्ये डीआरजीसोबत झालेल्या चकमकीत १० नक्षलवादी मारले गेले आहेत. तसेच घटनास्थळाहून इन्सास रायफल, एके-४७, एसएलआर आणि इतर अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली असून परिसरात सुरक्षा दलाची शोध मोहिम सुरू आहे.



दरम्यान या चकमकीनंतर मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी सुरक्षा दलाचे कौतुक केले आहे. यासंदर्भात सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरील संदेशात मुख्यमंत्री म्हणाले की, सैनिकांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. आमचे सरकार झिरो टॉलरन्सच्या धोरणावर काम करत नक्षलवाद्यांविरुद्ध जोरदार लढा देत आहे. बस्तरमध्ये विकास, शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करणे ही आमच्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे विष्णुदेव साई यांनी सांगितले.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी