पुणे : बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) शनिवारपर्यंत कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होणार असून, याच्या प्रभावामुळे राज्यात पुढील आठवडय़ात तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे. दरम्यान, राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, पुढील काही दिवस तो कायम राहण्याचा अंदाज आहे. (Weather Update)
दक्षिण अंदमानच्या समुद्रात (Andaman Sea) सध्या हवेची द्रोणीय स्थिती असून, २३ नोव्हेंबरपर्यंत त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होणार आहे. त्यानंतर पुढे या क्षेत्राची तीव्रता वाढणार आहे. हे क्षेत्र पश्चिम-उत्तर पश्चिमेकडे प्रवास करणार असून, यामुळे तामिळनाडू, केरळ, पाँडेचरी, आंध्र प्रदेशच्या भागात जोरदार पाऊस होणार आहे. याच्या प्रभावामुळे राज्यात बाष्पयुक्त हवा वाहणार असून, खासकरुन दक्षिण महाराष्ट्राच्या भागात ढगाळ वातावरण, तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे थंडीचा कडाका कमी होणार असून, किमान तापमान वाढणार असल्याचे हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे.
गेल्या आठवडय़ात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण महाराष्ट्रात पाऊस झाला होता. आताही तशीच स्थिती निर्माण झाली असून, २६ नोव्हेंबरनंतर कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्गच्या भागात पावसाचा अंदाज आहे.
राज्यात थंडीने हुडहुडी भरविली असून, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडय़ात याचा कडाका जास्त आहे. पुढील पाच दिवस थंडी कायम असेल, त्यानंतर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याने कडाका कमी होईल. (Maharashtra Weather)
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…