Mumbai Goa Highway : गावाकडे निघालेल्या मतदारांना वाहतूक कोंडीचा फटका!

मुंबई : राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) मतदान (Voting) प्रक्रिया पार पडत असून येत्या २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्व राजकीय नेते मंडळी, अभिनेते, सर्व सामान्य नागरिक मतदानाचा हक्क बजावत आहेत. मात्र अशावेळीच मतदान करण्यासाठी गावाकडे निघालेल्या चाकरमान्यांचे मोठे हाल होत असल्याचे दिसून येत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदार गावी निघाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक एसटी बसेस उपलब्ध केल्या आहेत. मात्र गावाकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे प्रवाशांना बसमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.


दरम्यान, एसटीचा फटका बसत असल्यामुळे मतदान करण्यासाठी गावी जाणाऱ्या मतदार खाजगी वाहनांचा वापर करत आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) मोठी वाहतूक कोंडी (Traffic Jam) निर्माण झाली असून मतदारांनाही मतदान केंद्रावर (polling station) पोहोचण्यासाठी विलंब होत आहे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात