Mumbai Goa Highway : गावाकडे निघालेल्या मतदारांना वाहतूक कोंडीचा फटका!

मुंबई : राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) मतदान (Voting) प्रक्रिया पार पडत असून येत्या २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्व राजकीय नेते मंडळी, अभिनेते, सर्व सामान्य नागरिक मतदानाचा हक्क बजावत आहेत. मात्र अशावेळीच मतदान करण्यासाठी गावाकडे निघालेल्या चाकरमान्यांचे मोठे हाल होत असल्याचे दिसून येत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदार गावी निघाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक एसटी बसेस उपलब्ध केल्या आहेत. मात्र गावाकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे प्रवाशांना बसमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.


दरम्यान, एसटीचा फटका बसत असल्यामुळे मतदान करण्यासाठी गावी जाणाऱ्या मतदार खाजगी वाहनांचा वापर करत आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) मोठी वाहतूक कोंडी (Traffic Jam) निर्माण झाली असून मतदारांनाही मतदान केंद्रावर (polling station) पोहोचण्यासाठी विलंब होत आहे.

Comments
Add Comment

Weather Update: राज्यात अवकाळीचा तडाखा, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना तीन तासासाठी अलर्ट

मुंबई: राज्यात अवकाळी पावसाने जोर धरला आहे. पुणे हवामान विभागाने मराठवाड्यातील प्रमुख जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट'

ऐन उन्हाळ्यात पुण्याला पावसाने झोपडले; आयटी पार्कमध्ये साचला बर्फ

पुणे : ऐन उन्हाळयात भर दुपारी पावसाने पुण्यात हजेरी लावली. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा पाऊस आणि गारपिटीने

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला मिळणार 'टेक ऑफ'

मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासासाठी १०० टक्के 'व्हिजिएफ' मंजूर; फ्लाय ९१ कंपनीची निवड, प्रति आसन २ हजार ९९१ रुपये

बिकट परिस्थिती, घरची जबाबदारी, अन पोलीस भरतीच स्वप्न; नेमकं भरतीवेळी शरीर थकलं अन्...

पुणे : अनेक होतकरू तरुण सरकारी नोकरीचा पाठलाग करत असतात. नोकरी मिळवून कुटुंबाला गरीबीतून बाहेर काढण्याचं स्वप्न

येत्या तीन महिन्यांत 'पीएनजी' साठी अर्ज न केल्यास 'एलपीजी' सिलिंडर बंद

मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा; व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस पुरवठ्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ मुंबई : राज्यातील

शेतकरी केवळ ‘उत्पादक’ नव्हे तर यशस्वी ‘उद्योजक’ व्हावा पणन मंत्री जयकुमार रावल

वाढवणजवळ उभारणार जगातील सर्वोत्तम बाजार व्यवस्था मुंबई : बदलत्या परिस्थितीत शेतकरी हा केवळ उत्पादक राहून