Mumbai Goa Highway : गावाकडे निघालेल्या मतदारांना वाहतूक कोंडीचा फटका!

मुंबई : राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) मतदान (Voting) प्रक्रिया पार पडत असून येत्या २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्व राजकीय नेते मंडळी, अभिनेते, सर्व सामान्य नागरिक मतदानाचा हक्क बजावत आहेत. मात्र अशावेळीच मतदान करण्यासाठी गावाकडे निघालेल्या चाकरमान्यांचे मोठे हाल होत असल्याचे दिसून येत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदार गावी निघाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक एसटी बसेस उपलब्ध केल्या आहेत. मात्र गावाकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे प्रवाशांना बसमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.


दरम्यान, एसटीचा फटका बसत असल्यामुळे मतदान करण्यासाठी गावी जाणाऱ्या मतदार खाजगी वाहनांचा वापर करत आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) मोठी वाहतूक कोंडी (Traffic Jam) निर्माण झाली असून मतदारांनाही मतदान केंद्रावर (polling station) पोहोचण्यासाठी विलंब होत आहे.

Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे