Mumbai Goa Highway : गावाकडे निघालेल्या मतदारांना वाहतूक कोंडीचा फटका!

  87

मुंबई : राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) मतदान (Voting) प्रक्रिया पार पडत असून येत्या २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्व राजकीय नेते मंडळी, अभिनेते, सर्व सामान्य नागरिक मतदानाचा हक्क बजावत आहेत. मात्र अशावेळीच मतदान करण्यासाठी गावाकडे निघालेल्या चाकरमान्यांचे मोठे हाल होत असल्याचे दिसून येत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदार गावी निघाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक एसटी बसेस उपलब्ध केल्या आहेत. मात्र गावाकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे प्रवाशांना बसमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.


दरम्यान, एसटीचा फटका बसत असल्यामुळे मतदान करण्यासाठी गावी जाणाऱ्या मतदार खाजगी वाहनांचा वापर करत आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) मोठी वाहतूक कोंडी (Traffic Jam) निर्माण झाली असून मतदारांनाही मतदान केंद्रावर (polling station) पोहोचण्यासाठी विलंब होत आहे.

Comments
Add Comment

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने