Assembly Election 2024 : बुथवर शुकशुकाट, उमेदवारांमध्ये घबराट!

सकाळच्या सत्रात मतदारांचा निरुत्साह


मुंबई : मुंबईसह राज्यात (Maharashtra Election) बहुतेक ठिकाणी मतदानाला (Assembly Election Voting) फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे सकाळच्या सत्रात दिसून आले. निवडणूक आयोग आणि विविध संस्थांमार्फत आवाहन करुन देखिल मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र सर्वत्र दिसते आहे.


राज्याच्या विकासावर गांभीर्याने चर्चा न करता दलबदलू नेते आणि प्रचारादरम्यान एकमेकांविरोधात केलेल्या चिखलफेकीमुळे मतदार काहीसे नाराज झाले असल्याचे दिसून येते.


दरम्यान, प्रत्येक विभागात सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदारांना मतदान (Voting) करण्यासाठी आवाहन करत असल्याचे दिसून आले. सकाळच्या सत्रात महिला वर्ग घरच्या कामामध्ये, स्वयंपाक करण्यात गुंतलेला असतो. त्यामुळे दुपारनंतर ख-या अर्थाने बुथवर चांगल्या प्रकारे मतदान होईल, असे सांगण्यात आले. (Assembly Election 2024)



सकाळच्या सत्रात झालेले मतदान


९ वाजेपर्यंत राज्यात ६.६१ टक्के मतदान झाले 




  • अहमदनगर - ५.९१ टक्के

  • अकोला - ६.० टक्के

  • अमरावती -६.६ टक्के

  • औरंगाबाद-७.५ टक्के

  • बीड -६.८८ टक्के

  • भंडारा- ६.२१ टक्के

  • बुलढाणा- ६.१६ टक्के

  • चंद्रपूर-८.५ टक्के

  • धुळे -६.७९ टक्के

  • गडचिरोली-१२.३३ टक्के

  • गोंदिया -७.९४ टक्के

  • हिंगोली -६.४५ टक्के

  • जळगाव - ५.८५ टक्के

  • जालना- ७.५१ टक्के

  • कोल्हापूर-७.३८ टक्के

  • लातूर ५.९१ टक्के

  • मुंबई शहर-६.२५ टक्के

  • मुंबई उपनगर-७.८८ टक्के

  • नागपूर -६.८६ टक्के

  • नांदेड -५.४२ टक्के

  • नंदुरबार-७.७६ टक्के

  • नाशिक - ६.८९ टक्के

  • उस्मानाबाद- ४.८५ टक्के

  • पालघर-७.३० टक्के

  • परभणी-६.५९ टक्के

  • पुणे - ५.५३ टक्के

  • रायगड - ७.५५ टक्के

  • रत्नागिरी-९.३० टक्के

  • सांगली - ६.१४ टक्के

  • सातारा - ५.१४ टक्के

  • सिंधुदुर्ग - ८.६१ टक्के

  • सोलापूर - ५.७,ठाणे ६.६६ टक्के

  • वर्धा - ५.९३ टक्के

  • वाशिम - ५.३३ टक्के

  • यवतमाळ - ७.१७ टक्के

Comments
Add Comment

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर