Scholarship Exam : शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद; अर्जासाठी दिली मुदतवाढ!

पुणे : राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालये, कृषी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण विभागातर्फे (Higher Education Department) १४ शिष्यवृत्ती योजना (Scholarship Exam) राबवल्या जातात. मात्र, शिष्यवृत्ती योजनांसाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध प्रवेशित विद्यार्थ्यांच्या तुलनेत अत्यंत कमी प्रतिसाद मिळाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे.



उच्च शिक्षण विभागाच्या पुणे विभागाचे सहसंचालक डॉ. अशोक उबाळे यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. उच्च शिक्षणाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी महाडीबीटी संकेतस्थळाद्वारे (Maha DBT) अर्ज भरावा लागतो. मात्र यंदा प्रवेशित विद्यार्थ्यांच्या तुलनेत अतिशय कमी अर्ज महाडीबीटी संकेतस्थळावर प्राप्त झाल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे २५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत शिष्यवृत्ती अर्ज सप्ताह राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



विशेष मोहिम उपलब्ध करण्याचे आवाहन


शिष्यवृत्ती योजनांसाठी (Scholarship Exam) अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी पुणे उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारितील पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील शासकीय, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालये, अकृषी विद्यापीठांमध्ये १४ शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज भरण्यासाठी महाविद्यालय, विद्यापीठ स्तरावर संगणक, इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,