Jharkhand Election 2024: झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यात ६७.५९ टक्के मतदान

मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीप्रमाणेच झारखंडमध्ये विधानसभेसाठी(Jharkhand Election 2024) दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात ३८ जागांसाठी आज मतदान झाले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत झारखंडमध्ये ६७ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले.


पहिल्या टप्प्यातील मतदान १३ नोव्हेंबरला झाले होते. यात ४३ जागांवर मतदान झाले होते. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात ६६ टक्के मतदान झाले होते.



सर्वाधिक मतदान जामताडामध्ये तर सर्वात कमी बोकारोमध्ये मतदान


संध्याकाळी पाच वाजेपर्यंत झारखंडमध्ये सर्वाधिक मतदान जामताडामध्ये झाले आहे. येथे ७६.१६ टक्के मतदान झाले. तर बोकारोमध्ये सर्वात कमी ६०.९७ टक्के मतदान झाले.



या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला


या टप्प्यात अनेक दिग्गजांचे भविष्य मतपेटीत बंद झाले. यात मुख्यमंत्री हेमंत सोरेन, त्यांची पत्नी कल्पना सोरेन, भाभी सीता सोरेन, भाजप प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी, विधानसभा अध्यक्ष रवींद्र नाथ महतो, ऑल झारखंड स्टुडंट यूनियन पक्षाचे अध्यक्ष सुदेश महतो आणि निर्वतमान विधानसभाचे नेता प्रतिपक्ष अमर कुमार बाऊरी(भाजप) यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

इस्रोच्या ब्लूबर्ड ब्लॉक-2 चे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्थाने नुकतेच एका ऐतिहासिक मोहिमेचे प्रक्षेपण केले आहे. श्रीहरिकोटा येथील

दिल्लीतील प्रदूषणावर निर्णायक कारवाई

८०० कारखाने बंद करण्याचा दिल्ली सरकारचा निर्णय नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदूषणावर निर्णायक कारवाई करण्याच्या

राजस्थानातील १५ गावांमध्ये महिलांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी

पंचायतीच्या ‘तुघलकी’ फरमानावरून उलट-सुलट चर्चा जालोर : राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि अजब

बडगाम NIA न्यायालयाचा मोठा निर्णय, अमेरिकेत राहणाऱ्या काश्मिरी लॉबिस्टची जमीन जप्त

बडगाम : जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातल्या एनआयए कोर्टाने मंगळवारी एक मोठा निर्णय दिला. अमेरिकेत राहणाऱ्या

पोलिसांसमोर २२ नक्षलवादी आले शरण

मलकानगिरी : मलकानगिरी जिल्ह्यात ओडिशा पोलिसांसमोर २२ नक्षलवादी शरण आले. आपल्या हातातील शस्त्र टाकून माओवादी

एनआयए प्रमुख सदानंद दाते होणार महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत अतिरेकी हल्ला केला होता. या