Jharkhand Election 2024: झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यात ६७.५९ टक्के मतदान

  69

मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीप्रमाणेच झारखंडमध्ये विधानसभेसाठी(Jharkhand Election 2024) दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात ३८ जागांसाठी आज मतदान झाले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत झारखंडमध्ये ६७ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले.


पहिल्या टप्प्यातील मतदान १३ नोव्हेंबरला झाले होते. यात ४३ जागांवर मतदान झाले होते. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात ६६ टक्के मतदान झाले होते.



सर्वाधिक मतदान जामताडामध्ये तर सर्वात कमी बोकारोमध्ये मतदान


संध्याकाळी पाच वाजेपर्यंत झारखंडमध्ये सर्वाधिक मतदान जामताडामध्ये झाले आहे. येथे ७६.१६ टक्के मतदान झाले. तर बोकारोमध्ये सर्वात कमी ६०.९७ टक्के मतदान झाले.



या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला


या टप्प्यात अनेक दिग्गजांचे भविष्य मतपेटीत बंद झाले. यात मुख्यमंत्री हेमंत सोरेन, त्यांची पत्नी कल्पना सोरेन, भाभी सीता सोरेन, भाजप प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी, विधानसभा अध्यक्ष रवींद्र नाथ महतो, ऑल झारखंड स्टुडंट यूनियन पक्षाचे अध्यक्ष सुदेश महतो आणि निर्वतमान विधानसभाचे नेता प्रतिपक्ष अमर कुमार बाऊरी(भाजप) यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे