Jharkhand Election 2024: झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यात ६७.५९ टक्के मतदान

  76

मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीप्रमाणेच झारखंडमध्ये विधानसभेसाठी(Jharkhand Election 2024) दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात ३८ जागांसाठी आज मतदान झाले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत झारखंडमध्ये ६७ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले.


पहिल्या टप्प्यातील मतदान १३ नोव्हेंबरला झाले होते. यात ४३ जागांवर मतदान झाले होते. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात ६६ टक्के मतदान झाले होते.



सर्वाधिक मतदान जामताडामध्ये तर सर्वात कमी बोकारोमध्ये मतदान


संध्याकाळी पाच वाजेपर्यंत झारखंडमध्ये सर्वाधिक मतदान जामताडामध्ये झाले आहे. येथे ७६.१६ टक्के मतदान झाले. तर बोकारोमध्ये सर्वात कमी ६०.९७ टक्के मतदान झाले.



या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला


या टप्प्यात अनेक दिग्गजांचे भविष्य मतपेटीत बंद झाले. यात मुख्यमंत्री हेमंत सोरेन, त्यांची पत्नी कल्पना सोरेन, भाभी सीता सोरेन, भाजप प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी, विधानसभा अध्यक्ष रवींद्र नाथ महतो, ऑल झारखंड स्टुडंट यूनियन पक्षाचे अध्यक्ष सुदेश महतो आणि निर्वतमान विधानसभाचे नेता प्रतिपक्ष अमर कुमार बाऊरी(भाजप) यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या