Assembly Election: मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुण्याहून येणारी मुले अमरावतीत अडकली

नागपूर : विधानसभा निवडणुकीत मतदान करता यावे म्हणून भारतीय जनता पक्षाने पुण्यातीलच नागपूरकर तरुणांसाठी विशेष बसची व्यवस्था केली. ठरल्याप्रमाणे मंगळवारी काही बसेस पुण्याहून नागपूरसाठी निघाल्या. पण आज बुधवारी पहाटेपासून त्या अमरावतीच्या नांदगाव पेठ टोलनाक्यावर अडकून पडलेल्या आहेत.



विदर्भात रोजगाराचा प्रश्न असल्याने येथील लाखो तरुण रोजगारासाठी पुणे,बंगरूळूला जातात. त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून राजकीय पक्ष त्यांना स्वखर्चाने नागपुरात आणतात आणि पोचवून देतात. लोकसभा निवडणुकीत हा प्रयोग यशस्वी झाला. म्हणून विधानसभा निवडणुकीत तो करण्यात आला. मात्र अमरावतीत बस अडकल्याने मतदार युवक संतापले. टोलच्या पैशावरून वाद झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. सकाळी ८ पर्यंत बसेस अमरावतीत अडकून होत्या.ठरल्या वेळेनुसार त्या सकाळी ६ ला नागपुरात येणार होत्या.
Comments
Add Comment

Women's and Children's Health : महिला व बालकांच्या पोषणात मोठी सुधारणा करण्याचे लक्ष्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई - राज्यातील कुपोषणावर प्रभावी नियंत्रण मिळवून महिला व बालकांच्या आरोग्य (Women's and Children's Health) आणि पोषणात लक्षणीय

Ashok Kharat Case : शिक्षण विभागाच्या शालेय आयडी घोटाळ्यातही भोंदू बाबा खरातचा सहभाग, स्वतःच्या भावाला मिळवून दिले आयडी

मुंबई : भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या प्रकरणांमध्ये आता नवीन ट्विस्ट निर्माण झाला असून नाशिक शहरांमध्ये काही

Weather Update: राज्यात अवकाळीचा तडाखा, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना तीन तासासाठी अलर्ट

मुंबई: राज्यात अवकाळी पावसाने जोर धरला आहे. पुणे हवामान विभागाने मराठवाड्यातील प्रमुख जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट'

ऐन उन्हाळ्यात पुण्याला पावसाने झोपडले; आयटी पार्कमध्ये साचला बर्फ

पुणे : ऐन उन्हाळयात भर दुपारी पावसाने पुण्यात हजेरी लावली. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा पाऊस आणि गारपिटीने

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला मिळणार 'टेक ऑफ'

मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासासाठी १०० टक्के 'व्हिजिएफ' मंजूर; फ्लाय ९१ कंपनीची निवड, प्रति आसन २ हजार ९९१ रुपये

बिकट परिस्थिती, घरची जबाबदारी, अन पोलीस भरतीच स्वप्न; नेमकं भरतीवेळी शरीर थकलं अन्...

पुणे : अनेक होतकरू तरुण सरकारी नोकरीचा पाठलाग करत असतात. नोकरी मिळवून कुटुंबाला गरीबीतून बाहेर काढण्याचं स्वप्न