Bitcoin: बिटकॉईन घोटाळ्यावरून भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोपबाजी

  88

मुंबई: राज्यात आत विधानसभेसाठी मतदान होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच भाजपकडून सुप्रिया सुळे(supriya sule) तसेच नाना पटोले यांच्यावर आरोपबाजी करण्यात आली आहे. पुण्याचे माजी पोलीस अधिकारी रवींद्र विकास यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर परकीय चलन वापरणे तसेच आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉईनचा(Bitcoin) वापर केल्याचा आरोप केला आहे.


भाजपचे खासदार तसेच प्रवक्ते सुंधाशू त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री ही पत्रकार परिषद घेतली होती. यादरम्यान हे आरोप करण्यात आले. तसेच त्यांनी पुरावे म्हणून कॉल रेकॉर्ड्स आणि व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉटही सादर केले. भाजपने मंगळवारी पत्रकार परिषद घेत पटोले आणि सुळे यांच्यावर आरोपबाजी केली. सुप्रिया सुळे आणि पटोले यांनी परकीय चलनाचा वापर करत मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचेही म्हणाले.



दरम्यान, भाजपने केलेले हे आरोप सुप्रिया सुळे यांनी फेटाळून लावले आहेत. तसेच केलेल्या आरोपाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे सुळे म्हणाल्या.

Comments
Add Comment

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम