Assembly Election 2024 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात ६५.११ टक्के मतदान!

  108

मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी (Assembly Election 2024) आज सकाळी ७ ते ६ या वेळेत सर्वसाधारणपणे काही तुरळक अपवाद वगळता शांततेत मतदान झाले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६५.११ टक्के मतदान झाले. गेल्या वेळी राज्यात ६१.४० टक्के मतदान झाले होते. तर आता येत्या शनिवारी, २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून त्यात राज्याचा कारभारी कोण होणार? हे स्पष्ट होईल.


दरम्यान, महायुतीने महिला, वयोवृद्ध यांसह समाजातील विविध घटकांसाठी लागू केलेल्या योजनांवर मतदार राजा किती खुश आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून विविध मुद्यांवर आरोप करून राज्य सरकारचे वाभाडे काढण्यात आले, याचाही मतदार कसा कौल देतो, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



३० वर्षांमधील सर्वाधिक मतदान


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ६५.११ टक्के मतदान झालं आहे. गेल्या ३० वर्षांमध्ये पहिल्यांदाच राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं पाहायला मिळालं आहे. १९९५ साली ७१.६९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. अलीकडच्या काही वर्षांमध्ये राज्यात कधीच ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झालं नव्हतं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६१.३९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६१.४ टक्के मतदान झालं होतं. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा ३.७ टक्के मतदान वाढलं आहे. ही मतदानाची वाढलेली आकडेवारी निवडणुकीच्या निकालात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.



मतदानाचं प्रमाण वाढवण्याच्या प्रयत्नांना अपयश


मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या चार मोठ्या शहरांमध्ये मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न केले होते. मात्र त्याला फारसे यश आले नसल्याचे पाहायला मिळाले. राज्यात सर्वाधिक ८२ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघात झाल आहे. तेथे वैद्याकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) समरजितसिंह घाटगे यांच्यातच चुरशीची लढत होत आहे. सर्वात कमी ४१ टक्के मतदान हे कल्याण पश्चिम मतदारसंघात झालं आहे. मंत्रालय व विधानभवन ही सत्तेची प्रमुख केंद्रे असलेल्या कुलाबा मतदारसंघांत टक्केवारी वाढवण्यासाठी बरेच प्रयत्न झाले असले तरी तिथे ४५ टक्केच मतदान झाले आहे.



सायंकाळी ६ वाजेपर्यंत झालेले मतदान



  • अहमदनगर - ७१.७३ टक्के

  • अकोला - ६४.९८ टक्के

  • अमरावती - ६५.५७ टक्के

  • औरंगाबाद- ६८.८९ टक्के

  • बीड - ६७.७९ टक्के

  • भंडारा - ६९.४२ टक्के

  • बुलढाणा - ७०.३२ टक्के

  • चंद्रपूर- ७१.२७ टक्के

  • धुळे - ६४.७० टक्के

  • गडचिरोली - ७३.६८ टक्के

  • गोंदिया - ६९.५३ टक्के

  • हिंगोली - ७१.१० टक्के

  • जळगाव - ६४.४२ टक्के

  • जालना - ७२.३० टक्के

  • कोल्हापूर - ७६.२५ टक्के

  • लातूर - ६६.९२ टक्के

  • मुंबई शहर- ५२.०७ टक्के

  • मुंबई उपनगर -५५.७७ टक्के

  • नागपूर - ६०.४९ टक्के

  • नांदेड - ६४.९२ टक्के

  • नंदुरबार- ६९.१५ टक्के

  • नाशिक - ६७.५७ टक्के

  • उस्मानाबाद - ६४.२७ टक्के

  • पालघर - ६५.९५ टक्के

  • परभणी - ७०.३८ टक्के

  • पुणे - ६१.०५ टक्के

  • रायगड - ६७.२३ टक्के

  • रत्नागिरी - ६४.५५ टक्के

  • सांगली - ७१.८९ टक्के

  • सातारा - ७१.७१ टक्के

  • सिंधुदुर्ग - ६८.४० टक्के

  • सोलापूर - ६७.३६ टक्के

  • ठाणे - ५६.०५ टक्के

  • वर्धा - ६८.३० टक्के

  • वाशिम - ६६.०१ टक्के

  • यवतमाळ - ६९.०२ टक्के मतदान झाले.


सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेले मतदान



  • अहमदनगर -  ६१.९५ टक्के

  • अकोला -५६.१६ टक्के

  • अमरावती - ५८.४८  टक्के

  • औरंगाबाद - ६०.८३ टक्के

  • बीड - ६०.६२ टक्के

  • भंडारा - ६५.८८ टक्के

  • बुलढाणा - ६२.८४  टक्के

  • चंद्रपूर - ६४.४८ टक्के

  • धुळे - ५९.७५ टक्के

  • गडचिरोली - ६९.६३ टक्के

  • गोंदिया - ६५.०९  टक्के

  • हिंगोली - ६१.१८ टक्के

  • जळगाव - ५४.६९ टक्के

  • जालना - ६४.१७ टक्के

  • कोल्हापूर - ६७.९७ टक्के

  • लातूर - ६१.४३ टक्के

  • मुंबई शहर - ४९.०७ टक्के

  • मुंबई उपनगर - ५१.७६ टक्के

  • नागपूर - ५६.०६ टक्के

  • नांदेड-  ५५.८८ टक्के

  • नंदुरबार- ६३.७२  टक्के

  • नाशिक - ५९.८५  टक्के

  • उस्मानाबाद - ५८.५९ टक्के

  • पालघर- ५९.३१ टक्के

  • परभणी - ६२.७३ टक्के

  • पुणे -  ५४.०९ टक्के

  • रायगड -  ६१.०१ टक्के

  • रत्नागिरी - ६०.३५ टक्के

  • सांगली - ६३.२८ टक्के

  • सातारा - ६४.१६ टक्के

  • सिंधुदुर्ग - ६२.०६ टक्के

  • सोलापूर - ५७.०९ टक्के

  • ठाणे - ४९.७६ टक्के

  • वर्धा -  ६३.५० टक्के

  • वाशिम - ५७.४२  टक्के

  • यवतमाळ - ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.


दुपारी ३ वाजेपर्यंत झालेले मतदान



  • अहमदनगर -  ४७.८५ टक्के

  • अकोला - ४४.४५ टक्के

  • अमरावती -४५.१३  टक्के

  • औरंगाबाद - ४७.०५ टक्के

  • बीड - ४६.१५ टक्के

  • भंडारा - ५१.३२ टक्के

  • बुलढाणा - ४७.४८  टक्के

  • चंद्रपूर - ४९.८७ टक्के

  • धुळे - ४७.६२ टक्के

  • गडचिरोली - ६२.९९ टक्के

  • गोंदिया - ५३.८८  टक्के

  • हिंगोली - ४९.६४टक्के

  • जळगाव - ४०.६२ टक्के

  • जालना - ५०.१४ टक्के

  • कोल्हापूर -  ५४.०६ टक्के

  • लातूर - ४८.३४ टक्के

  • मुंबई शहर- ३९.३४ टक्के

  • मुंबई उपनगर-४०.८९  टक्के

  • नागपूर - ४४.४५ टक्के

  • नांदेड-  ४२.८७ टक्के

  • नंदुरबार- ५१.१६  टक्के

  • नाशिक - ४६.८६  टक्के

  • उस्मानाबाद - ४५.८१ टक्के

  • पालघर- ४६.८२ टक्के

  • परभणी - ४८.८४ टक्के

  • पुणे -  ४१.७० टक्के

  • रायगड -  ४८.१३ टक्के

  • रत्नागिरी - ५०.०४टक्के

  • सांगली - ४८.३९ टक्के

  • सातारा - ४९.८२टक्के

  • सिंधुदुर्ग - ५१.०५ टक्के

  • सोालपूर - ४३.४९ टक्के

  • ठाणे - ३८.९४ टक्के

  • वर्धा -  ४९.६८ टक्के

  • वाशिम -४३.६७  टक्के

  • यवतमाळ - ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.


दुपारी १ वाजेपर्यंत झालेले मतदान



  • अहमदनगर -  ३२.९० टक्के

  • अकोला - २९.८७ टक्के

  • अमरावती - ३१.३२ टक्के

  • रंगाबाद - ३३.८९ टक्के

  • बीड - ३२.५८ टक्के

  • भंडारा- ३५.०६ टक्के

  • बुलढाणा- ३२.९१ टक्के

  • चंद्रपूर- ३५.५४ टक्के

  • धुळे - ३४.०५ टक्के

  • गडचिरोली-५०.८९ टक्के

  • गोंदिया - ४०.४६ टक्के

  • हिंगोली -३५.९७ टक्के

  • जळगाव - २७.८८ टक्के

  • जालना- ३६.४२ टक्के

  • कोल्हापूर- ३८.५६ टक्के

  • लातूर -  ३३.२७ टक्के

  • मुंबई शहर- २७.७३ टक्के

  • मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के

  • नागपूर - ३१.६५ टक्के

  • नांदेड - २८.१५ टक्के

  • नंदुरबार- ३७.४० टक्के

  • नाशिक - ३२.३० टक्के

  • उस्मानाबाद- ३१.७५ टक्के

  • पालघर-३३.४० टक्के

  • परभणी-३३.१२टक्के

  • पुणे - २९.०३ टक्के

  • रायगड - ३४.८४  टक्के

  • रत्नागिरी-३८.५२ टक्के

  • सांगली - ३३.५० टक्के

  • सातारा -३४.७८ टक्के

  • सिंधुदुर्ग - ३८.३४ टक्के

  • सोलापूर - २९.४४

  • ठाणेे - २८.३५ टक्के

  • वर्धा - ३४.५५ टक्के

  • वाशिम - २९.३१ टक्के

  • यवतमाळ - ३४.१० टक्के



सकाळी ९ वाजेपर्यंत झालेले मतदान



  • अहमदनगर -  १८.२४ टक्के

  • अकोला - १६.३५ टक्के

  • अमरावती - १७.४५ टक्के

  • औरंगाबाद- १८.९८ टक्के

  • बीड - १७.४१ टक्के

  • भंडारा - १९.४४ टक्के

  • बुलढाणा - १९.२३ टक्के

  • चंद्रपूर - २१.५० टक्के

  • धुळे - २०.११ टक्के

  • गडचिरोली -३० टक्के

  • गोंदिया - २३.३२ टक्के

  • हिंगोली -१९.२० टक्के

  • जळगाव - १५.६२ टक्के

  • जालना - २१.२९ टक्के

  • कोल्हापूर- २०.५९ टक्के

  • लातूर १८.५५ टक्के

  • मुंबई शहर- १५.७८ टक्के

  • मुंबई उपनगर- १७.९९ टक्के

  • नागपूर - १८.९० टक्के

  • नांदेड - १३.६७ टक्के

  • नंदुरबार- २१.६० टक्के

  • नाशिक - १८.७१ टक्के

  • उस्मानाबाद- १७.०७ टक्के

  • पालघर-१९ .४० टक्के

  • परभणी-१८.४९ टक्के

  • पुणे - १५.६४ टक्के

  • रायगड - २०.४० टक्के

  • रत्नागिरी-२२.९३ टक्के

  • सांगली - १८.५५ टक्के

  • सातारा -१८.७२ टक्के

  • सिंधुदुर्ग - २०.९१ टक्के

  • सोलापूर - १५.६४

  • ठाणे१६.६३ टक्के

  • वर्धा - १८.८६ टक्के

  • वाशिम - १६.२२ टक्के

  • यवतमाळ -१६.३८ टक्के

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित