Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली; पण 'या' भागात उन्हाचा कडाका कायम!

वाचा आजचे हवामान वृत्त


मुंबई : हिवाळी मोसमाला (Winter Season) सुरुवात झाली असून मागील दोन दिवसांपासून काहीशी थंडी लागण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात काही ठिकाणी हवेत गारवा जाणवत असला तरीही नागरिकांना दुपारी उन्हाची झळ (Heat) सोसावी लागत आहे. मात्र हे चढ उताराच्या वातावरणापासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पुढील काही दिवसांत राज्यात सर्वत्र थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. (Weather Update Today)



सध्या महाराष्ट्रात थंडी वाढू लागली आहे. किमान तापमान हे ११ अंशापर्यंत घसरले आहे. आजपासून या तापमानात अजून घट होणार आहे. राज्याच्या तापमानात २ ते ४ अंशांची घट होणार असल्याने गारठा वाढवण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने याबाब अंदाज वर्तवला आहे.



कोणत्या भागात गारवा?


जळगाव, महाबळेश्वर आणि पुण्यातील तापमानातही घट झाली आहे. त्यामुळे तेथे काहीसा गारवा जाणवू लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात पुढील पाच ते सहा दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही रात्री हवेत गारवा जाणवत आहे.



मुंबईत उन्हाचा कडाका


मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात सध्या उन्हाचा चटका अधिक आहे. तरी राज्यात कमाल तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Weather)

Comments
Add Comment

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद

हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला बीड: ओबीसी