Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली; पण 'या' भागात उन्हाचा कडाका कायम!

वाचा आजचे हवामान वृत्त


मुंबई : हिवाळी मोसमाला (Winter Season) सुरुवात झाली असून मागील दोन दिवसांपासून काहीशी थंडी लागण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात काही ठिकाणी हवेत गारवा जाणवत असला तरीही नागरिकांना दुपारी उन्हाची झळ (Heat) सोसावी लागत आहे. मात्र हे चढ उताराच्या वातावरणापासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पुढील काही दिवसांत राज्यात सर्वत्र थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. (Weather Update Today)



सध्या महाराष्ट्रात थंडी वाढू लागली आहे. किमान तापमान हे ११ अंशापर्यंत घसरले आहे. आजपासून या तापमानात अजून घट होणार आहे. राज्याच्या तापमानात २ ते ४ अंशांची घट होणार असल्याने गारठा वाढवण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने याबाब अंदाज वर्तवला आहे.



कोणत्या भागात गारवा?


जळगाव, महाबळेश्वर आणि पुण्यातील तापमानातही घट झाली आहे. त्यामुळे तेथे काहीसा गारवा जाणवू लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात पुढील पाच ते सहा दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही रात्री हवेत गारवा जाणवत आहे.



मुंबईत उन्हाचा कडाका


मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात सध्या उन्हाचा चटका अधिक आहे. तरी राज्यात कमाल तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Weather)

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून

मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत