पैसे वाटपावरून ठाकरे-शिंदे गट आमनेसामने; पालघरमध्ये तणाव

पालघर : राज्यातील थंड हवामानातही पालघरच्या राजकीय वातावरणाने तापमान वाढवले आहे. पैसे वाटपावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. या प्रकरणामुळे विष्णूनगर भागात तणाव निर्माण झाला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.


विष्णूनगर भागातील वर्धमान सोसायटीमध्ये शिंदे गटाचे नगरसेवक रवींद्र म्हात्रे व अमोल पाटील वेळ संपून गेल्यानंतरही प्रचारासाठी गेले होते. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, प्रचाराच्या नावाखाली पैसे वाटप करण्यात येत होते. यावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला. काही वेळातच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले आणि शाब्दिक बाचाबाची झाली.



प्रसंगाची माहिती मिळताच पालघर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती शांत करत संशयित कार ताब्यात घेतली. मात्र, तपासणीत कारमध्ये पैसे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे पुरावे आढळले नाहीत. पोलिसांनी दोन्ही गटांना समज दिली आणि तणाव निवळला.


प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले असून, अधिकृत तक्रारींचा तपास सुरू आहे. या घटनेने निवडणुकीनंतरही राजकीय संघर्ष कसा चिघळतो आहे, हे स्पष्ट झाले आहे.


पालघरमधील या घटनेने ठाकरे व शिंदे गटातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. हे प्रकरण भलेही थांबले असले तरी या राजकीय संघर्षाचा परिणाम स्थानिक वातावरणावर होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

२०१० पासून टियर १ शहरांमध्ये परवडणाऱ्या घरांच्या किमतीत मोठी सुधारणा: कॉलियर्स

मुंबई: दिलेल्या नव्या अहवालातील माहितीनुसार, प्रमुख शहरांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासामुळे, परवडणाऱ्या

वसई-विरारमध्ये ४ माजी नगरसेवक भाजपच्या गळाला

विरार : वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीला भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. बविआचे एकापाठोपाठ एक पदाधिकारी व

'हायटेक केसपेपर नोंदणी' ठरतेय डोकेदुखी !

अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या लांब रांगा अलिबाग  : येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये आयुष्मान

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार

मुंबई : शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार व

गोरेगावमधील मलनिस्सारण वाहिनीच्या खोदकामामुळे नागरिक हैराण

भाजपच्या माजी नगरसेविकेने अधिकाऱ्यांना घेतले फैलावर मुंबई  : गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर मार्गावर मल जल

निकाल लागून ४५ दिवसांनंतरही भरती प्रक्रिया मंदावलेलीच!

वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेत गोंधळ निकालानंतर ‘अतिरिक्त गुण’ नियम बदलाचा निर्णय वैद्यकीय आरोग्य