Politics: एकनाथ खडसे राजकारणातून निवृत्ती घेणार?

जळगाव: जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली आहे. याशिवाय, खडसे यांनी जळगाव ग्रामीण, एरंडोल-पारोळा, आणि जामनेर मतदारसंघातील शरद पवार गटाच्या उमेदवारांसाठी प्रचार केला.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुढील निवडणुकीत सक्रिय सहभाग असणार की नाही, याबाबत निर्णय परमेश्वरावर सोडला असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या वादानंतर खडसे यांनी २०२० मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवर आमदारकीची संधी दिली. मात्र, त्यानंतरही त्यांनी भाजपमध्ये परतण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले. मात्र, भाजपकडून कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने खडसे यांचा पक्षांतराचा प्रयत्न थांबला. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार असलेल्या त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी त्यांनी काम केले होते. मात्र, लोकसभा निवडणूक संपल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत राहण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले की,आरोग्याच्या कारणांमुळे आता फारसा राजकीय प्रवास शक्य नाही. मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही, या विधानामुळे खडसे राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.


खडसे यांची कन्या रोहिणी यांना मिळालेली उमेदवारी आणि पक्षातील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर, खडसे यांची भूमिका राष्ट्रवादीसाठी महत्त्वाची ठरली आहे. मात्र प्रकृती अस्वास्थ्य आणि वाढत्या वयानुसार त्यांनी आता राजकीय जबाबदाऱ्यांपासून दूर राहण्याचा विचार केला आहे. यामुळे खडसे यांची राजकीय कारकीर्द एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर आली असून, त्यांच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय