Politics: एकनाथ खडसे राजकारणातून निवृत्ती घेणार?

जळगाव: जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली आहे. याशिवाय, खडसे यांनी जळगाव ग्रामीण, एरंडोल-पारोळा, आणि जामनेर मतदारसंघातील शरद पवार गटाच्या उमेदवारांसाठी प्रचार केला.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुढील निवडणुकीत सक्रिय सहभाग असणार की नाही, याबाबत निर्णय परमेश्वरावर सोडला असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या वादानंतर खडसे यांनी २०२० मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवर आमदारकीची संधी दिली. मात्र, त्यानंतरही त्यांनी भाजपमध्ये परतण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले. मात्र, भाजपकडून कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने खडसे यांचा पक्षांतराचा प्रयत्न थांबला. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार असलेल्या त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी त्यांनी काम केले होते. मात्र, लोकसभा निवडणूक संपल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत राहण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले की,आरोग्याच्या कारणांमुळे आता फारसा राजकीय प्रवास शक्य नाही. मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही, या विधानामुळे खडसे राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.


खडसे यांची कन्या रोहिणी यांना मिळालेली उमेदवारी आणि पक्षातील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर, खडसे यांची भूमिका राष्ट्रवादीसाठी महत्त्वाची ठरली आहे. मात्र प्रकृती अस्वास्थ्य आणि वाढत्या वयानुसार त्यांनी आता राजकीय जबाबदाऱ्यांपासून दूर राहण्याचा विचार केला आहे. यामुळे खडसे यांची राजकीय कारकीर्द एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर आली असून, त्यांच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद