Crop Insurance : ११,७८९ हेक्टर क्षेत्रावर बनावट पीक विमा

कांदा पिक विम्यामध्ये आढळला गैरप्रकार


पुणे: कांदा पिकाची लागवड केलेली नसताना तपासणी झालेल्या नाशिक, अहिल्यानगर आणि सातारा जिल्ह्यांत मिळून एकूण ११ हजार ७८९ हेक्टर क्षेत्रावर बनावट पीक विमा उतरविल्याचे स्पष्ट झाले आहे. या तीनही जिल्ह्यांतील अहवाल प्राप्त झाले असून, त्यामध्ये बनावट कांदा पीक विमा क्षेत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बनावट अर्ज रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्यामुळे शासनाचे पीक विमा हप्त्यापोटी सुमारे ७ कोटी २६ लाख रुपयांच्या विमा रकमेची बचत झाल्याचे कृषी विभागातून स्पष्ट करण्यात आले.


नाशिक, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांत मिळून खरीप हंगामात कांद्याची एकूण ७५ हजार ७१३ हेक्टवर प्रत्यक्ष लागवड झाली. तर प्रत्यक्षात तब्बल २ लाख ६४ हजार २४७ हेक्टर क्षेत्रावर पीक विमा उतरविण्यात आला. म्हणजेच १ लाख ८८ हजार ५३४ हेक्टर क्षेत्रावर कांद्याचे पीक नसताना पीक विमा काढल्याचे स्पष्ट झाल्याने कृषी आयुक्तालयातून राज्यातील बनावट क्षेत्राची तपासणी करण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावर देण्यात आल्या. त्याअन्वये नाशिक जिल्ह्यातील तपासणीत आत्तापर्यंत १ हजार ७७३ हेक्टर, अहमदनगर जिल्ह्यात ७३८ हेक्टर आणि सातारा जिल्ह्यात सर्वाधिक ९ हजार २७८ हेक्टर मिळून एकूण ११ हजार ७८९ हेक्टरवर बनावट पीक विमा उतरविल्याचे कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार आढळून आले आहे.



राज्यात धुळे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, बीड या प्रमुख जिल्ह्यांचा कांदा पीक नसताना विमा उतरविलेल्या क्षेत्राच्या स्थितीचा अहवाल पुढील आठवडाअखेरीस मिळण्याची अपेक्षा आहे. त्यातून नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची अपेक्षा आहे. तसेच नाशिकमधील पूर्ण अहवाल अद्याप येणे बाकी असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
विधानसभा निवडणूक आचारसंहिता सुरू असून, कृषी विभागाचा अधिकारी- कर्मचारीवर्ग निवडणूक कामात गुंतलेला आहे. त्यामुळे बनावट कांदा पिकाचे क्षेत्र शोधण्यास वेळ लागत आहे. राज्यात धुळे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, बीड या प्रमुख जिल्ह्यांचा कांदा पीक नसताना विमा उतरविलेल्या क्षेत्राच्या स्थितीचा अहवाल पुढील आठवडाअखेरीस मिळण्याची अपेक्षा आहे. त्यातून नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी