Crop Insurance : ११,७८९ हेक्टर क्षेत्रावर बनावट पीक विमा

  123

कांदा पिक विम्यामध्ये आढळला गैरप्रकार


पुणे: कांदा पिकाची लागवड केलेली नसताना तपासणी झालेल्या नाशिक, अहिल्यानगर आणि सातारा जिल्ह्यांत मिळून एकूण ११ हजार ७८९ हेक्टर क्षेत्रावर बनावट पीक विमा उतरविल्याचे स्पष्ट झाले आहे. या तीनही जिल्ह्यांतील अहवाल प्राप्त झाले असून, त्यामध्ये बनावट कांदा पीक विमा क्षेत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बनावट अर्ज रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्यामुळे शासनाचे पीक विमा हप्त्यापोटी सुमारे ७ कोटी २६ लाख रुपयांच्या विमा रकमेची बचत झाल्याचे कृषी विभागातून स्पष्ट करण्यात आले.


नाशिक, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांत मिळून खरीप हंगामात कांद्याची एकूण ७५ हजार ७१३ हेक्टवर प्रत्यक्ष लागवड झाली. तर प्रत्यक्षात तब्बल २ लाख ६४ हजार २४७ हेक्टर क्षेत्रावर पीक विमा उतरविण्यात आला. म्हणजेच १ लाख ८८ हजार ५३४ हेक्टर क्षेत्रावर कांद्याचे पीक नसताना पीक विमा काढल्याचे स्पष्ट झाल्याने कृषी आयुक्तालयातून राज्यातील बनावट क्षेत्राची तपासणी करण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावर देण्यात आल्या. त्याअन्वये नाशिक जिल्ह्यातील तपासणीत आत्तापर्यंत १ हजार ७७३ हेक्टर, अहमदनगर जिल्ह्यात ७३८ हेक्टर आणि सातारा जिल्ह्यात सर्वाधिक ९ हजार २७८ हेक्टर मिळून एकूण ११ हजार ७८९ हेक्टरवर बनावट पीक विमा उतरविल्याचे कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार आढळून आले आहे.



राज्यात धुळे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, बीड या प्रमुख जिल्ह्यांचा कांदा पीक नसताना विमा उतरविलेल्या क्षेत्राच्या स्थितीचा अहवाल पुढील आठवडाअखेरीस मिळण्याची अपेक्षा आहे. त्यातून नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची अपेक्षा आहे. तसेच नाशिकमधील पूर्ण अहवाल अद्याप येणे बाकी असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
विधानसभा निवडणूक आचारसंहिता सुरू असून, कृषी विभागाचा अधिकारी- कर्मचारीवर्ग निवडणूक कामात गुंतलेला आहे. त्यामुळे बनावट कांदा पिकाचे क्षेत्र शोधण्यास वेळ लागत आहे. राज्यात धुळे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, बीड या प्रमुख जिल्ह्यांचा कांदा पीक नसताना विमा उतरविलेल्या क्षेत्राच्या स्थितीचा अहवाल पुढील आठवडाअखेरीस मिळण्याची अपेक्षा आहे. त्यातून नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय, पुण्यात 27 ते 6 तारखेपर्यंत दारू बंदी

पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. पुण्यात २७ ते ६

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी