Crop Insurance : ११,७८९ हेक्टर क्षेत्रावर बनावट पीक विमा

  97

कांदा पिक विम्यामध्ये आढळला गैरप्रकार


पुणे: कांदा पिकाची लागवड केलेली नसताना तपासणी झालेल्या नाशिक, अहिल्यानगर आणि सातारा जिल्ह्यांत मिळून एकूण ११ हजार ७८९ हेक्टर क्षेत्रावर बनावट पीक विमा उतरविल्याचे स्पष्ट झाले आहे. या तीनही जिल्ह्यांतील अहवाल प्राप्त झाले असून, त्यामध्ये बनावट कांदा पीक विमा क्षेत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बनावट अर्ज रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्यामुळे शासनाचे पीक विमा हप्त्यापोटी सुमारे ७ कोटी २६ लाख रुपयांच्या विमा रकमेची बचत झाल्याचे कृषी विभागातून स्पष्ट करण्यात आले.


नाशिक, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांत मिळून खरीप हंगामात कांद्याची एकूण ७५ हजार ७१३ हेक्टवर प्रत्यक्ष लागवड झाली. तर प्रत्यक्षात तब्बल २ लाख ६४ हजार २४७ हेक्टर क्षेत्रावर पीक विमा उतरविण्यात आला. म्हणजेच १ लाख ८८ हजार ५३४ हेक्टर क्षेत्रावर कांद्याचे पीक नसताना पीक विमा काढल्याचे स्पष्ट झाल्याने कृषी आयुक्तालयातून राज्यातील बनावट क्षेत्राची तपासणी करण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावर देण्यात आल्या. त्याअन्वये नाशिक जिल्ह्यातील तपासणीत आत्तापर्यंत १ हजार ७७३ हेक्टर, अहमदनगर जिल्ह्यात ७३८ हेक्टर आणि सातारा जिल्ह्यात सर्वाधिक ९ हजार २७८ हेक्टर मिळून एकूण ११ हजार ७८९ हेक्टरवर बनावट पीक विमा उतरविल्याचे कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार आढळून आले आहे.



राज्यात धुळे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, बीड या प्रमुख जिल्ह्यांचा कांदा पीक नसताना विमा उतरविलेल्या क्षेत्राच्या स्थितीचा अहवाल पुढील आठवडाअखेरीस मिळण्याची अपेक्षा आहे. त्यातून नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची अपेक्षा आहे. तसेच नाशिकमधील पूर्ण अहवाल अद्याप येणे बाकी असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
विधानसभा निवडणूक आचारसंहिता सुरू असून, कृषी विभागाचा अधिकारी- कर्मचारीवर्ग निवडणूक कामात गुंतलेला आहे. त्यामुळे बनावट कांदा पिकाचे क्षेत्र शोधण्यास वेळ लागत आहे. राज्यात धुळे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, बीड या प्रमुख जिल्ह्यांचा कांदा पीक नसताना विमा उतरविलेल्या क्षेत्राच्या स्थितीचा अहवाल पुढील आठवडाअखेरीस मिळण्याची अपेक्षा आहे. त्यातून नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या