Crop Insurance : ११,७८९ हेक्टर क्षेत्रावर बनावट पीक विमा

कांदा पिक विम्यामध्ये आढळला गैरप्रकार


पुणे: कांदा पिकाची लागवड केलेली नसताना तपासणी झालेल्या नाशिक, अहिल्यानगर आणि सातारा जिल्ह्यांत मिळून एकूण ११ हजार ७८९ हेक्टर क्षेत्रावर बनावट पीक विमा उतरविल्याचे स्पष्ट झाले आहे. या तीनही जिल्ह्यांतील अहवाल प्राप्त झाले असून, त्यामध्ये बनावट कांदा पीक विमा क्षेत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बनावट अर्ज रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्यामुळे शासनाचे पीक विमा हप्त्यापोटी सुमारे ७ कोटी २६ लाख रुपयांच्या विमा रकमेची बचत झाल्याचे कृषी विभागातून स्पष्ट करण्यात आले.


नाशिक, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांत मिळून खरीप हंगामात कांद्याची एकूण ७५ हजार ७१३ हेक्टवर प्रत्यक्ष लागवड झाली. तर प्रत्यक्षात तब्बल २ लाख ६४ हजार २४७ हेक्टर क्षेत्रावर पीक विमा उतरविण्यात आला. म्हणजेच १ लाख ८८ हजार ५३४ हेक्टर क्षेत्रावर कांद्याचे पीक नसताना पीक विमा काढल्याचे स्पष्ट झाल्याने कृषी आयुक्तालयातून राज्यातील बनावट क्षेत्राची तपासणी करण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावर देण्यात आल्या. त्याअन्वये नाशिक जिल्ह्यातील तपासणीत आत्तापर्यंत १ हजार ७७३ हेक्टर, अहमदनगर जिल्ह्यात ७३८ हेक्टर आणि सातारा जिल्ह्यात सर्वाधिक ९ हजार २७८ हेक्टर मिळून एकूण ११ हजार ७८९ हेक्टरवर बनावट पीक विमा उतरविल्याचे कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार आढळून आले आहे.



राज्यात धुळे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, बीड या प्रमुख जिल्ह्यांचा कांदा पीक नसताना विमा उतरविलेल्या क्षेत्राच्या स्थितीचा अहवाल पुढील आठवडाअखेरीस मिळण्याची अपेक्षा आहे. त्यातून नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची अपेक्षा आहे. तसेच नाशिकमधील पूर्ण अहवाल अद्याप येणे बाकी असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
विधानसभा निवडणूक आचारसंहिता सुरू असून, कृषी विभागाचा अधिकारी- कर्मचारीवर्ग निवडणूक कामात गुंतलेला आहे. त्यामुळे बनावट कांदा पिकाचे क्षेत्र शोधण्यास वेळ लागत आहे. राज्यात धुळे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, बीड या प्रमुख जिल्ह्यांचा कांदा पीक नसताना विमा उतरविलेल्या क्षेत्राच्या स्थितीचा अहवाल पुढील आठवडाअखेरीस मिळण्याची अपेक्षा आहे. त्यातून नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

‘आंदोलन कायम ठेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार’- बच्चू कडू

मुंबईला जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार नागपूर : कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातल्या आरोपीने लपवलेल्या मोबाईलमध्ये मिळाला मृत्यूपूर्वीचा 'तो' फोटो...

फलटण: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा झाला आहे. आत्महत्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हिव्हिपॅट नाहीच; काय दिलं निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत कायद्यांत तरतूद नाही मुंबई : स्थानिक

Maharashtra Local Body Election : १० नोव्हेंबरआधी आचारसंहिता लागू होणार? मोठी अपडेट आली समोर

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी माहिती

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन मुंबई  : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि

Navneet Rana : भाजप नेत्या नवनीत राणांना अश्लील शिवीगाळ, पत्राद्वारे 'गँगरेप' आणि 'जीवे मारण्याची' धमकी; राजापेठ पोलिसांकडून तपास सुरू

अमरावती : भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर