Typing Exam : गैरप्रकार टाळण्यासाठी संगणक टंकलेखन परिक्षेच्या वेळापत्रकात बदल!

  64

१ डिसेंबरऐवजी 'या' तारखेला होणार परीक्षा


अलिबाग : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (Maharashtra State Examination Council) घेण्यात येणाऱ्या संगणक टंकलेखन परिक्षेच्या (Typing Exam) वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार या परीक्षा येत्या १ डिसेंबर ते १५ डिसेंबर य कालावधीत घेण्यात येणार होत्या. मात्र, आता या परीक्षा ९ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेने दिली.


संगणक टंकलेखन परीक्षेसाठी राज्यभरातून एक लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परिक्षा परिषदेने मॅन्युअल टायपिंग' आणि लघुलेखन परीक्षेसाठीचे वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध केले जाण्याची शक्यता आहे.



गेल्या काही वर्षांत मॅन्युअल टायपिंग परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे, तर संगणक टंकलेखन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. परिक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा परिषदेकडून अनेक बदलही करण्यात आले आहेत. परिषदेतर्फे जुनमध्ये घेण्यात आलेल्या टंकलेखन, लघुलेखन परीक्षांमध्ये अनेक तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे वेळापत्रकात बदल करावा लागला होता. आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षांमध्ये तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी परिषदेकडून खबरदारी घेतली जाईल, असे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या